आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, खरीप हंगामाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली, पीक विमा कंपनीने कुठल्याही प्रकारची नैसर्गिक नुकसानीची मदत दिली नाही. हवालदिल झालेल्या शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय द्यावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रशांत वानखडे, शहराध्यक्ष सय्यद जहीर, संकेत टोणे, जिल्हा उपाध्यक्ष आशिष सोळंके, रमेश कठाळे, प्रवीण खेवले, दिनकर कोंबे, अशोक भोंग, विजय कालंकार, धीरज जुनघरे, नागेश ठाकरे, दीपक तातेड, मधुकर निवल, शहजाद शेख, माधव नेरकर आदी सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.