आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिधन, राजीनामा व अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील १३२ ग्रामपंचायतींमधील २०५ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. गेल्या एक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक आहेत. त्यामुळे या निवडणुका कधी लागतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाही अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत कुणीही स्पष्ट बोलण्यास तयार नाही. अशात राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
यात यवतमाळ जिल्ह्यातील १३२ ग्रामपंचायतींतील २०५ सदस्यपदासाठी पोटनिवडणूक होणार आहे. तर दोन ठिकाणी थेट सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी १८ एप्रिलला अधिसूचना काढली जाणार आहे. तर २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत रिक्त जागांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. तद्नंतर ३ मे रोजी अर्जाची छाननी होणार असून, दि. ८ मे पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. त्याचदिवशी चिन्ह वाटप केले जाणार आहे. आणि प्रत्यक्षात दि. १८ मे रोजी मतदान होणार आहे. काही महिन्याआधी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. तर सध्या १५ बाजार समित्यांची निवडणूक सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.