आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा\तालुक्यातील बामणोद येथे तीन जणांना वीज चोरी करताना राज्य वीज महावितरण कंपनीच्या पथकाने पकडले होते. वीज चोरी केली यासाठी त्यांना तडजोड अंती दंड आकारण्यात आला होता. मात्र त्यांनी दंडाची रक्कम न भरल्याने अखेर या तिघांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य वीज महावितरण कंपनीचे बामणोद येथील अभियंता देवेंद्र सुधाकर भंगाळे यांनी यावल पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फिर्याद दिली.
त्यानुसार त्यांनी स्वत: बामणोद येथील रहिवासी रमेश मिठाराम सोनवणे, चिंतामण माधव सोनवणे व विलास सुपडू सोनवणे या तीन जणांकडे वीज चोरी केल्या प्रकरणी कारवाई केली होती. अाणि त्या तिघांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आकारून ताे दंड तत्काळ भरण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र या तिघांनी दंडाची रक्कम भरलीच नाही. त्यामुळे अखेर दंड अदा न केल्याने अभियंता भंगाळे यांनी फिर्याद दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.