आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस कोसळल्याची नोंद आहे. तरीसुद्धा उन्हाळ्यात पाणी टंचाई प्रचंड प्रमाणात निर्माण होते. टँकरची संख्यासुद्धा अधिक राहते. अशा गावातील कामांना जल जीवन मिशनच्या माध्यमातून टंचाईमुक्त करावे, अशा सुचना प्रधान सचिवांनी दिल्या आहेत. सन २०२२ मध्ये ५८, तर सन २०२३ ह्या वर्षांत ४७ टँकर लावण्यात आले होते. जिल्ह्यात दरवर्षी काही तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होते. अशा गावांना टंचाईमुक्त करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या उपाय योजना करण्यात येतात, परंतू ह्या उपाय योजना तोकड्या स्वरूपात पडत आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या दिवसांत टँकर, खासगी विहिर अधिग्रहण आदी उपाय योजना प्रस्तावित कराव्याच लागत आहे.
अशा टंचाईग्रस्त गावांना जल जीवन मिशन मधून प्राधान्य द्यावे, असे निर्देश प्रधान सचिवांनी नुकतेच प्रशासनाला दिले आहे. यात प्रामुख्याने सन २०२२ मध्ये जिल्ह्यात एकूण ५८ टँकर लावण्यात आले होते. या टँकरच्या देयकापोटी कोट्यवधी रूपयांचा फटका शासनाला सहन करावा लागला आहे. तर पावसाळ्यानंतर पुन्हा टंचाईने तोंड वर काढले. यात मागिल वर्षी जिल्ह्यात ३८२ हून अधिक उपाय योजना राबवण्यात आल्या होत्या.
यात प्रामुख्याने ३०१ खासगी विहिर अधिग्रहण, ४७ टँकर, नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्तीची २८, तर तात्पुरत्या पुरक नळ योजनांची ४, अशा उपाय योजनांचा समावेश होता. यातील ४७ टँकरग्रस्त गावांना टँकरमुक्त करण्याचा मानस शासनाचा आहे. त्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन मधून कामे प्रस्तावित करावी आणि अशा कामांना प्राधान्य द्यावे, अशा सुचना प्रधान सचिवांनी दिल्या आहेत.
शासनाने जल जीवन मिशन माध्यमातून जिल्ह्यात साडे पाचशे कोटीहून अधिक रुपयांची कामे सध्या प्रस्तावित आहेत. यात आवश्यक त्या ठिकाणी कामेसुद्धा सध्या सुरू आहे. त्यामुळे पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटण्याची शक्यता आहे.
आता १२ पंचायत समितीचे प्रस्ताव प्राप्त
दरवर्षी प्रमाणे यंदाही पंचायत समितीतून संभाव्य पाणी टंचाईचे प्रस्ताव बोलावण्यात आले होते. तत्पूर्वी लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी, असेही सुचवण्यात आले होते. त्या नुसार आतापर्यंत जिल्ह्यातील १२ पंचायत समितीतील प्रस्ताव प्राप्त झाले आहे. उर्वरीत तालुक्यातील प्रस्ताव लवकरच येणार असून, संभाव्य पाणी टंचाईवर शिक्कामोर्तब होणार आहे. दरवर्षी पेक्षा कमी संभाव्य टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.