आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील गणेशपूर येथे रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब रहदारीसाठी अडथळा ठरत आहे. ते हटवण्याची वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने अखेर गणेशपूर ग्रा. पं.च्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवार, २ फेब्रुवारी रोजी महावितरणचे कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनानुसार रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब आल्याने वाहतुकीची कोंडी होत असून, एखादी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच अनेक विद्युत खांब जीर्ण झाले असून ते बदलण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना सरपंच शोभा विजय जाधव, विष्णू जाधव, ग्रा. पं. सदस्य विजय मुटकुळे, नामदेव कामखेडे, रामजी खंडागळे, मोरे आदी उपस्थित होते. तर ही समस्या लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन यावेळी रिसोड येथील महावितरणचे अभियंता हरीश गिर्हे यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.