आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुलांना सर्वार्थाने सक्षम बनवण्यासाठी शाळेत पाठवा‎

दिग्रस‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या मुलांना सर्वार्थाने सक्षम‎ बनवण्यासाठी त्यांना दररोज शाळेत पाठवणे‎ गरजेचे आहे. मुलांची बुद्धी विकसित‎ होण्यासाठी त्यांना योग्य शिक्षण आवश्यक‎ असते. शाळेत दररोज घेण्यात येणारा‎ पाठ्यक्रम त्यांचे ज्ञान वाढवतो. शाळेत‎ विविध मैदानी खेळ खेळवले जातात.‎ आपल्या मुलांची बौद्धिक पातळी तपासून‎ त्यांची शिक्षण व खेळातील आवड निवड‎ निश्चित करून त्यांची प्रगती साधता येते‎ म्हणून पालकांनो, मुलांना दररोज शाळेत‎ पाठवा, असे आवाहन यवतमाळ जिल्हा‎ शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी केले.‎

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श‎ शाळा चिंचोली क्रमांक २ येथे दि. २८‎ जानेवारीला विद्यार्थ्यांचा शालेय सांस्कृतिक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यक्रम आयोजित केला, त्यांच्या‎ उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ‎ जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रमोद‎ सूर्यवंशी तर प्रमुख अतिथी‎ गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, जिल्हा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख,‎ सरपंच हरीश मनवर, माजी सरपंच मीनाक्षी‎ देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष‎ विजय खंडारे, हरसुल केंद्राचे केंद्रप्रमुख‎ हेमंत दळवी, अंगणवाडी सुपरवायझर सुनंदा‎ वाघ, माजी केंद्रप्रमुख महानंदा गरबळे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आयटक संघटनेच्या रचना जाधव, रमा‎ गजभार, शाळेचे माजी मुख्याध्यापक राजू‎ ढोले, दुर्गादास गायकवाड, वानखडे, सुनील‎ कांबळे, रमेश गावंडे, सतीश जयस्वाल,‎ सुनील नाटकर, मोतीराम खेकाळे,‎ अंगणवाडी सेविका इंदू इंगोले, कांता‎ जयस्वाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.‎

या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेच्या पूजनाने‎ झाली. यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपापले‎ मनोगत व्यक्त केले. आदर्श शाळा चिंचोली‎ येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर उत्कृष्ट‎ खेळून चॅम्पियन ट्रॉफी जिंकून आणून‎ जिल्हास्तरावर निवड झाल्याने मान्यवरांनी‎ त्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी‎ विविध प्रकारचे नृत्य , नाटके सादर करून‎ नागरिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन वैशाली दातीर, सोनाली‎ चिकणे यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक‎ हिराकांत बोबडे यांनी मानले. सदर‎ कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक‎ हिराकांत बोबडे, श्रीमती इंदु अडपवार,‎ नितीन डहाके, सोनाली चिकणे, वैशाली‎ दातीर, संध्या तायडे यांनी अथक परिश्रमातून‎ कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.‎

बातम्या आणखी आहेत...