आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचार बंदीमुळे‎ खाण्यापिण्याची गैरसोय:शिवभोजन थाळी केंद्रांना लागली घरघर‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना‎ दहा रुपयांत जेवण उपलब्ध व्हावे, या‎ उद्देशाने तत्कालीन महाविकास आघाडी‎ सरकारने शिवभोजन थाळी योजना सुरू‎ केली होती. हातावर पोट असलेल्यांसाठी‎ ही थाळी कोराना काळात महत्त्वपूर्ण‎ ठरली. मात्र मागील तीन महिन्यांपासून या‎ योजनेचे अनुदान थकल्याने अल्पदरात‎ हजारो नागरिकांचे पोट भरणाऱ्या‎ चालकांवर केंद्र बंद करण्याची वेळ‎ आली आहे.‎ कोरोना काळात संचार बंदीमुळे‎ खाण्यापिण्याची गैरसोय होत असलेल्या‎ बेघर, स्थलांतरित, वाटसरू, मोलमजुरी ‎ ‎ करणारे तसेच गोरगरीब मजुरांना‎ अल्पदरात जेवण मिळावे म्हणून‎ तत्कालीन महाविकास आघाडी‎ सरकारने स्वस्त दरात शिवभोजन थाळी ‎ ‎ उपलब्ध करून देण्याची योजना सुरू‎ केली होती.

मात्र जानेवारी महिन्यापासून ‎ ‎ जिल्ह्यातील काही शिवभोजन केंद्राचे ‎ ‎ अनुदान रखडल्याने त्यांना घरघर लागली ‎ ‎ आहे. येत्या काही दिवसांत अनुदान न ‎ ‎ मिळाल्यास केंद्र बंद करावे लागेल, अशा ‎ ‎ प्रतिक्रिया काही शिवभोजन थाळी केंद्र ‎ ‎ संचालकांनी व्यक्त केल्यात. असे‎ झाल्यास आर्थिकदृष्ट्या कमकुवत ‎ ‎ असलेल्या नागरिकांची परवड होईल.‎

अनुदान जमा करावे‎ शासनाकडून शिवभोजन संदर्भात‎ चर्चा सुरू आहे.परंतू, शिवभोजन‎ केंद्र चालवताना अनुदानाची वाट न‎ पाहता गोरगरिबांना दररोज भाेजन‎ वाटप करावे लागते.केंद्र‎ चालवण्यासाठी विविध स्तरावरून‎ कर्ज काढण्यात आले.त्यामुळे‎ विविध अडचणींचा सामना करावा‎ लागत आहे.शासनाने तीन महिन्यांचे‎ अनुदान जमा करावे,अशी मागणी‎ शिवभोजन केंद्र चालकाकडून‎ करण्यात येत आहे.‎