आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनी व महिलांनी खंबीरपणे‎ वागणे आज काळाची गरज‎:जागतिक महिला दिनी रचना जाधव यांचे प्रतिपादन‎

दिग्रस‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांनी व मुलींनी आपली स्वतः ची‎ सुरक्षा स्वतः केली पाहिजे त्यासाठी सक्षम‎ होणे काळाची गरज आहे. आपण कसे‎ वागतो, आपण कोणाची संगत केली‎ पाहिजे कोणाची नाही हे समजणे आज‎ आवश्यक झाले आहे. मुलींनी व स्त्रियांनी‎ मोबाईल वापरतांना कोणत्या गोष्टी‎ आपल्या फायद्याच्या आहे व कोणत्या‎ नुकसान पोहोचवू शकते याकडे लक्ष देणे‎ गरजेचे आहे. कारण आपल्या निष्काळजी‎ वागणाने आपले केव्हाही नुकसान होऊ‎ शकते त्यासाठी मुलींनी व स्त्रियांनी‎ खंबीरपणे वागणे काळाची गरज‎ असल्याचे मत अंगणवाडी, बालवाडी‎ कर्मचारी युनियन आयटक अध्यक्षा तथा‎ राज्य कौन्सिल सदस्या रचना जाधव यांनी‎ व्यक्त केले.‎ दिग्रस तालुक्यातील चिंचोली क्रमांक २‎ येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक‎ महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत‎ होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ माजी सरपंच मीनाक्षी देशमुख, आयटक‎ संघटना सचिव रमा गजभार, अंगणवाडी‎ - बालवाडी कर्मचारी युनियन आयटक‎ अध्यक्षा तथा राज्य कौन्सिल सदस्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रचना जाधव, एकात्मिक बाल विकास‎ सुपरवायझर सुनंदा वाघ, आरोग्य सेविका‎ कल्पना वाघाडे, चिंचोली अंगणवाडी‎ सेविका इंदू सोनुने, कांता जयस्वाल, वैदेही‎ कांबळे, वर्षा ढाले, शीतल इंगोले, मंदा‎ कांबळे, सविता मिरासे, सोनाली चिकने,‎ संध्या तायडे उपस्थित होत्या. जागतिक‎ महिला दिनाच्या सुरवातीला विद्येची देवता‎ माता सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई‎ फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजनाने‎ झाली. यावेळी उपस्थित मान्यवर‎ महिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ‎ देऊन सन्मान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...