आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:यवतमाळचे आमदार मदन येरावार यांचे प्रतिपादन, स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा उत्साहात‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या भारतभूच्या वीर पुत्राची, देश‎ भक्तीची उत्कट भावना, प्रखरता‎ संपूर्ण जगाने अनुभवली. त्या‎ सावरकरांवर टीका करणे ही‎ आपली संस्कृती नाही आणि‎ योग्यताही नाही. म्हणतात ना नाही‎ निर्मल जीवन काय करेल साबण;‎ जैशी दृष्टी तैशी सृष्टी!//" त्यामुळे‎ दृष्टी नव्हे दृष्टीकोन बदला सावरकर‎ कळेल” असे मार्मिक उद्गार गौरव‎ यात्रा समापन प्रसंगी यवतमाळचे‎ आमदार मदन येरावार यांनी व्यक्त‎ केले. संत सेना महाराज चौक येथे‎ गौरव यात्रा समापन प्रसंगी ते बोलत‎ होते.‎ यावेळी मंचावर राष्ट्रिय‎ स्वयंसेवक संघाचे नगर संघ-‎ चालक धनंजय पाचघरे, प्रमुख‎ वक्ते, डॉ. सतपाल सोहळे,‎ सावरकर विचाराचे अभ्यासक डॉ.‎ नितीन खर्चे, भाजपा जिल्हाध्यक्ष‎ नितीन भुतडा, शिवसेनाजिल्हा‎ संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार,‎ जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, पराग‎ पिंगळे, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत‎ यादव पाटील, भाजप महिला प्रदेश‎ उपाध्यक्ष रेखा कोठेकर उपस्थित‎ होते.

यावेळी विचार व्यक्त करताना‎ येरावार म्हणाले की, सवंग‎ लोकप्रियतेसाठी देवी-देवता,‎ देशप्रेमी- देशभक्त, प्रज्ञावंत-‎ विचारवंत, यांच्या बद्दल अनुद्गार‎ काढणे. पात्रता, योग्यता नसतानाही‎ त्यांचा अनादर करणे, अपमान‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करणे हे उचित नाही, योग्य नाही,‎ सुसंस्कृतपणाचं लक्षणही नाही. ज्या‎ देशाने जगाला विचारा सोबत‎ विवेकही दिला, ज्या देशाच्या‎ अध्यात्माने संपूर्ण विश्वाला वसुधैव‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कुटुंबकम्'', हे विश्वची माझे घर हा‎ संदेश दिला त्या देशात हे शोभत‎ नाही असेही येरावार म्हणाले.‎

याप्रसंगी सावरकर विचाराचे‎ सखोल अभ्यासक डॉ. सतपाल‎ सोहळे यांनी एक भावनिक वृत्तांत‎ कथन केला. अंदमानच्या जेल मध्ये‎ खायला मिळणारे उदान्न, यातना‎ देणारा कोल, वेताचे फटके,‎ खोडाबंदी, साखळदंडाने करकचून‎ आठ आठ दिवसापर्यंत बांधून‎ ठेवणे, शारीरिक व मानसिक‎ खच्चीकरण करणाऱ्या शिक्षा आणि‎ या सर्वांची जाहिरात केली जात‎ होती. केवढे हे क्रौर्य? हे ऐकुन सहन‎ न झाल्यामुळे इंदू भूषण रॉय यांनी‎ आत्महत्या केली. उल्हासकर‎ दत्तवर हाउ वेडे झाले आणि हे‎ सोसणारे, भोगणारे सावरकर अटल‎ होते, निश्चल होते, कारण ते‎ मृत्युंजय होते, अवध्य होते. अशा‎ मृत्यूंजयांना माफीवीर म्हणने याचा‎ विचार करण्याची वेळ आता आली‎ असल्याचे ते म्हणाले. मधुरा‎ वेरुळकर, ऋचा गढिकर यांनी वंदे‎ मातरम ''हे राष्ट्रगीत सादर केले.

या‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा‎ आध्यात्मिक आघाडी पश्चिम‎ विदर्भ संयोजक शंतनु शेटे यांनी‎ केले. रेखा कोठेकर यांना आभार‎ व्यक्त केले. हा उपक्रम संपन्न‎ करण्यात भाजपा शहराध्यक्ष प्रशांत‎ यादव पाटील, शिवसेनेचे पराग‎ पिंगळे, भाजपाचे शंतनू शेटे, अजय‎ खोंड, हेमंत दायमा, प्रा. डॉ. अमोल‎ देशमुख, ज्ञानेश्वर सुरजूसे, राकेश‎ मिश्रा, नितीन गिरी, रेखा कोठेकर,‎ वैशाली खोंड, माया शेरे, उषा खटे,‎ आकाश धुरट, योगेश पाटील, उमेश‎ राठोड, शुभम चोरमले, सुरज जैन‎ इत्यादींनी स्वयंस्फुर्तीने प्रयत्न केले.‎