आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया देशात संवैधानिक मूल्याचे पालन होणे काळाची गरज असून संविधा ामुळेच आपल्या देशाचा सर्वांगीण विकास झाला आहे कारण संविधान हा सर्वश्रेष्ठ कायदा असल्याचे प्रतिपादन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ज्योती काळबांडे यांनी केले. त्या संविधान दिनानिमित्त मिलिंद महाविद यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथक व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ''संवि ानाचा जागर ''या विविध उपक्रमाद्वारे आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. अध्यक् स्थानी महाविद् यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. पवार होते तर प्रमुख अतिथी म्हणून समाजश स्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयमाला लाडे, पाली विभाग प्रमुख प्रा. क्रांती मुनेश्वर तर प्रबोधनकार डॉ. अनिल काळबांडे उपस्थित होते. यावेळी संविधा नाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
तर मान्यवरांचा संविधान ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. लाडे यांनी मार्गदर्शन केले. तर डॉ. काळबांडे यांनी संविधाना समोरील आव्हाने या विषयावर सविस्तर विवेचन केले. यावेळी विविध स्पर्धा महाविद यालयात घेण्यात आल्या त्यात ''भारतीय संविधान या विषयावर निबंध स्पर्धेत प्रथम पौर्णिमा लोमटे, द्वितीय रागिनी लोखंडे, तृतीय अंकिता ढोले यासह २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर ''मूलभूत कर्तव्य या विषयावर निबंध स्पर्धेत रागिनी लोखंडे आकाश कराळे या विद्यार थ्यांसह ''संविधान त्यांचे महत्त्व या विषय वरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन संविधाना प्रती भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे संचालन पायल चव्हाण हिने तर आभार मनवर यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.