आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासौंदर्यींकरणाच्या उद्देशाने वर्धा शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले. मात्र या रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम विभागाला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वर्धा शहरातील विविध कामे प्रगतीपथावर असून, रस्त्याचे सिमेंट- काॅँक्रिटीकरणासाठी रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले होते. रस्ते झाले मात्र, रस्त्याच्या मधोमध खड्डे पडलेले असून, त्यावर अद्याप गट्टू लावण्यात आले नाहीत. रस्त्यावर खड्डे पडलेले असल्याने, वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच पाठदुखी, मानेचा त्रास व इतर आजारांना रस्त्यावरील खड्डे आमंत्रण देत आहेत. परंतु बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. याबाबत वर्धा बांधकाम विभागाचे मतीन नळगिरे यांनी रस्त्याचे काम सुरु असून, रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्डयांमध्ये आठवडाभरात गट्टू लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.