आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलजीवन मिशन अंतर्गत बांधकाम करण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असुन त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याने या कामाची चौकशी करून या कामाचे देयक काढण्यात येवु नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपाल राठोड यांनी केली आहे. महागाव तालुक्यातील साई (ई) येथे नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला. या कामाचे कंत्राटपांढरकर नामक कंत्राटदाराला मिळाले. परंतु त्यांनी स्वतः काम न करता दुसऱ्याच कंत्राटदाराला काम करण्यास दिले आहे. त्यामुळे कंत्राट देताना घालुन दिलेल्या अटी व शर्थीला फाट्यावर मारण्याचे काम कंत्राटदाराने केले आहे. सद्या या योजनेतील पाण्याच्या टाकीचे बांधकाम चालू असुन यासाठी लागणारे साहित्य माती मिश्रीत रेती, गिट्टी, सिमेंट हे निकृष्ठ दर्जाचे वापरण्यात येत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.