आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील ग्रामपंचायतीमधील वार्ड क्रमांक ६ मधील रहिवाशी अमोल ढवळे यांनी घरासमोर असलेल्या सार्वजनिक नालीचे बांधकाम करून त्यावर रापटा टाकून सदरील जाण्या येण्याचा मार्ग सुरळीत करावा, यासाठी गेल्या अनेक दिवसापासून ग्रामपंचायतला निवेदन देवून पाठपुरावा केला. प्रसंगी ग्राम सभेमध्ये देखील त्यांनी हाच विषय रेटून धरला होता. यावर ग्रामपंचायतने तोडगा काढत तात्पुरत्या स्वरूपाचे त्या नालीवर सिमेंटचे पाईप व मुरूम टाकून सदरील विषय निकाली काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्या टाकलेल्या पाईप व मुरमामुळे त्या नालींचे घाण पाणी व्यवस्थितपणे वाहून जाईल असे वाटत असताना उलट त्याच ठिकाणी साचून रहात आहे.त्यामुळे परिसरातील अनेक घरांना या साचलेल्या घाण पाण्यामुळे नाहक ञास सहन करावा लागत आहे.अनेक परिवारांचे आरोग्य या साचलेल्या घाण पाण्यामुळे धोक्यात आले आहे.त्यांना मलेरिया सारख्या आजारांना समोर जावे लागत आहे.
सदरील रस्त्यावरून चालणे देखील कठीण होऊन बसले आहे.त्यामुळे सदरील पाईप काढून त्या जागी पक्या स्वरूपाची सिमेंट ची नाली बांधून त्यावर रापटा टाकावा व घरासमोर साचलेले पाणी सुरळीत करावे अशी मागणी अमोल ढवळे यांनी निवेदनाच्या माध्यमातून गटविकास अधिकारी प.स महागाव यांच्याकडे केली आहे. या गंभीर विषयाची दखल वेळीच न घेतल्या २६ जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषण करणार असल्याचा इशारा अमोल ढवळे यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.