आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोषण आहार योजना राबवताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार वाढले आहे. यावर निर्बंध बसवण्याच्या दृष्टीने शासनाने आता जिल्हास्तरावर भरारी पथक नेमण्याचे आदेश दिले आहे. या पथकात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. शाळा तपासणी करून आवश्यक उपाय योजना पथकाला सुचवाव्या लागणार आहे. विशेष म्हणजे तालुकास्तरावर सुद्धा अशाच पद्धतीने पथक गठीत करावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा पोषण आहार मिळण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथक स्थापन करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार भरारी पथकात जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.