आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज‎:एटीएम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर;‎ सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज‎

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध बँकांच्या‎ एमटीएममध्ये पैसे नसून केवळ कचरा पडलेला‎ असतो. तसेच एमटीएममध्ये सुरक्षा रक्षकही तैनात‎ नसतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला‎ आहे. नागरीक पैस काढण्यासाठी एमटीएममध्ये‎ जातात परंतु त्यात पैसे नसल्याने त्यांना बँकेत जावे‎ लागते. बँकेत रांगेत उभे राहून दोन तीन तासांनंतर‎ नंबर लागल्यानंतर बँकेचे कर्मचारी एटीएममधून‎ पैस काढण्याचा सल्ला देतात.

बँक जोपर्यंत उघडत‎ नाही, तोपर्यंत एमटीएममध्ये पैसे नसतात. याच‎ कारणाने नागरिकांना बँक उघडण्याची वाट पाहत‎ ताटकळत बसावे लागत आहे. एटीएममधून पैस‎ मिळत नसल्याने आणि बँकेत रांगेत उभे राहून पैसे‎ काढावे लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन‎ करावा लागत आहे. एमटीएममध्ये पैसे‎ शोधण्यासाठी नागरिकांना या एटीएममधून त्या‎ एटीएमकडे सैरावैरा पळावे लागत आहे. यासोबतच‎ जवळपास सर्वच बँकांच्या एमटीएममध्ये सुरक्षा‎ रक्षकच नसल्याचे दिसून येते.‎

बातम्या आणखी आहेत...