आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी यांचे आढावा बैठकीत निर्देश‎:शासकीय योजनांच्या जत्रेतून गरजू‎ लाभार्थींना मिळावा योजनांचा लाभ‎

वाशीम‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल, मे महिन्यात जिल्ह्यात आयोजित‎ शासकीय योजनांच्या जत्रेतून गरजू‎ लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ‎ देण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे,‎ असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन‎ एस. यांनी दिले. बुधवारी जिल्हाधिकारी‎ कार्यालयातील वाकाटक सभागृहात‎ अायाेजित आढावा सभेत जिल्हाधिकारी‎ षण्मुगराजन बोलत होते.‎ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी‎ अधिकारी वसुमना पंत, सहायक‎ जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नु पी. एम.,‎ निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,‎ जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे,‎ जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय‎ काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.‎ सुहास कोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित‎ होते. पुढे बाेलताना ते म्हणाले की,‎ शासकिय योजनांचा लाभ जिल्ह्यातील‎ शेवटच्या घटकापर्यंत संबंधित यंत्रणांनी‎ पोहोचवावा.

संबंधित लाभार्थींना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ योजनांचा लाभ देण्यासाठी कोणकोणत्या‎ कागदपत्रांची आवश्यकता आहे, त्याची‎ पूर्तता लाभार्थींकडून करुन घ्यावी.‎ लाभार्थींकडून योजनेचा लाभ‎ मिळण्यासाठी अर्ज सादर करुन घ्यावेत.‎ कोणत्याही गरजू लाभार्थींचा अर्ज नामंजूर‎ केला जाणार नाही याची जबाबदारी‎ संबंधित विभागाची आहे. प्रत्येक यंत्रणेचा‎ या जत्रेमध्ये सहभाग राहणार आहे.‎ यंत्रणेने या जत्रेच्या दृष्टीने काम करीत‎ असलेल्या कामांचा अहवाल जिल्हा‎ जनकल्याण कक्षाला दररोज सादर‎ करावा. लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ देण्यात येणाऱ्या सेवांची विविध यंत्रणांनी‎ प्रभावी अंमलबजावणी करावी.

तसेच‎ आपले सरकार सेवा केंद्रामार्फत देण्यात‎ येणाऱ्या ऑनलाईन सेवा हया लाभार्थींना‎ वेळेत उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन‎ करावे, असे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक‎ गावातून १०० पेक्षा जास्त, तालुक्यातून १५‎ हजार, तर जिल्ह्यातून ७५ हजार‎ लाभार्थींना एकाच दिवशी योजनांचा लाभ‎ देण्याचे नियोजन करावे असे त्यांनी सूचित‎ केले. यावेळी श्री. हिंगे यांनी शासकीय‎ योजनांची जत्रा या उपक्रमाची माहिती‎ दिली.‎