आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील ग्रामीण रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांसह लोकांची वर्दळ असते; परंतु रुग्णालयाकडून पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय होत नाही. सकाळी भरलेले पाणी काही तासांतच संपल्यावर पुन्हा पाण्याचा पत्ता नसतो, अशी नेहमी ओरड असते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी, अशी मागणी रुग्णांसह नागरिकांकडून केली जात आहे.
या रुग्णालयात दररोज तालुक्यातील विविध ठिकाणांहून नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र,पाणी मिळत नसल्याने त्यांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच अनेक रुग्ण हे या रुग्णालयात एकटेच उपचार घेण्याकरिता येत असतात. त्यांनाही अंगावर आजार घेऊन पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन ग्रामीण रुग्णालयात पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. रुग्णांप्रमाणेच येथे येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांची देखील तारांबळ होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.