आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंग्रामपूर तालुक्यात २०२२-२३ मधील खरीप हंगामात सोयाबीन पिकाची उत्पादकता ३१ जानेवारी रोजी निश्चित झाल्याने विम्याचा मार्ग मोकळा झाला. विमा कंपन्यांनी तात्काळ निकषानुसार मंजुर झालेला सोयाबीन पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेत अनेक त्रुटी आहेत. या योजनेत शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित करण्याची पद्धत अशास्त्रीय असून जोखीम स्तर ७० टक्क्यावरून १०० टक्के करण्याची गरज आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत अनेक त्रुटी आहेत.
या योजनेत शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित करण्याची पद्धत अशास्त्रीय असून जोखीम स्तर ७० टक्क्यावरून १०० टक्के करण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारच्या दुष्काळाचे निकष आणि कंपन्यांच्या पीक विम्यासाठीचे पात्रतेचे निकष यात ताळमेळ बसत नाही. यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही. मार्च महिन्यात केंद्र शासनाच्या हिस्स्याचा निधी कंपनीला मिळाल्याने उत्पादनावर आधारीत विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हानिहाय वाटपाला सुरुवात उत्पादनावर आधारीत पिक विमा मध्ये सोयाबीन पिकाकरिता सोनाळामहसुल मंडळ सरसकट मदती करीता पात्र ठरले आहे. राज्यात पिक विमाकंपनीकडून जिल्हानिहाय वाटपाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वैयक्तिकतक्रार मदत वजा करुन उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमाकरण्याची गरज आहे.- विजय हागे, शेतकरी लाडणापूर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.