आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांचीही उपस्थिती‎:वसंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी‎ जिल्हाकचेरीत भरवली शाळा‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी येथील‎ विद्यार्थ्यांना मागील सहा महिन्यांपासून गणित‎ व अन्य विषय शिकवायला शिक्षकच‎ नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत‎ आहे. परिणामी वसंत आदिवासी‎ विद्यालयातील विद्यार्थी व पालकांनी गुरुवार,‎ २ फेब्रुवारी रोजी जिल्हाकचेरीवर धडक दिली‎ व कार्यालयाच्या परिसरातच शाळा भरवली.‎ पार्डी नस्करी येथील वसंत आदिवासी‎ विद्यालयातील वर्ग आठवी ते दहावीचे‎ शंभरावर विद्यार्थी या ठिकाणी आले होते.‎

यावेळी पालकांनी शाळेवर प्रशासकाची‎ नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी केली.‎ शाळेतील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत‎ राजकारणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक भविष्य‎ धोक्यात आले असून, शाळेत कुठल्याच‎ प्रकारच्या सोयीसुविधा नसल्याची खंत‎ पालकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना‎ बसण्यासाठी बाकडे नसून, प्रयोगशाळा‎ देखील नाही. शाळेला दरवाजे काय,‎ शौचालयसुद्धा नसल्याने मुलींची मोठी‎ कुचंबणा होत असल्याचा आरोप पालकांनी‎ केला आहे.

अकरावी व बारावीची मान्यता‎ नसतानासुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश‎ देण्यात आल्याने अनधिकृत वर्गही चालवले‎ जात असल्याचे यावेळी पालकांनी सांगितले.‎ विद्यार्थ्यांची होणारी अडचण पाहता‎ ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना घेऊन थेट‎ जिल्हाधिकारी कार्यालयच गाठले. या‎ ठिकाणी विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. शाळेच्या‎ संचालक मंडळात गेल्या काही दिवसांपासून‎ वाद सुरू आहे. त्याचा विपरीत परिणाम‎ विद्यार्थ्यांवर होत असल्याचा आरोपदेखील‎ ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी विद्यार्थी,‎ पालक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आदी‎ उपस्थित होते.‎.‎

बातम्या आणखी आहेत...