आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार वितरण‎:राष्ट्रसंत, राष्ट्रपित्यांना अभिप्रेत‎ असलेल्या धर्माची आज खरी गरज‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रसंतांना व राष्ट्रपित्याला अभिप्रेत‎ असलेला धर्म हा आजच्या‎ तथाकथित साधू संत मानतात का,‎ हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आजच्या‎ तरुणांना राष्ट्रसंत आणि राष्ट्रपिता‎ समजायचा असेल, तर साहित्य‎ आणि त्यांच्या विचार आत्मसात‎ करायला पाहिजे. राष्ट्रसंताचा धर्म‎ होता सर्वधर्माचा समन्वय,‎ विश्वशांतीचा उपाय,‎ लोकसुधारणेचे विद्यालय, हा‎ सर्वधर्मांना घेऊन चालणारा आणि‎ सर्वधर्मांचा सन्मान करणारा धर्म हा‎ राष्ट्रसंतांना अभिप्रेत असल्याचे मत‎ संभाजी ब्रिगेड प्रवक्ते तथा प्रमुख‎ वक्ते प्रेमकुमार बोके यांनी व्यक्त‎ केले. तसेच जोपर्यंत इतर धर्मांबद्दल‎ आदर करणार नाही तोपर्यंत‎ राष्ट्रपित्याला आणि राष्ट्रसंतांना‎ अभिप्रेत असलेला देश आम्ही घडू‎ शकणार नाही, असे प्रतिपादनही‎ यावेळी प्रमुख वक्ते बोके यांनी केले.‎

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज‎ यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार‎ व्हावा या उद्देशाने राष्ट्रधर्म युवा मंच‎ जिल्ह्याच्या वतीने पहिले राज्यस्तरीय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार‎ साहित्य संमेलन शहरातील अभियंता‎ भवन येथे पार पडले. दोन दिवसीय‎ संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष आचार्य‎ हरिभाऊ वेरुळकर हे होते, तर डॉ.‎ सुभाष सावरकर यांच्या हस्ते उद्घाटन‎ शनिवारी झाले.

पहिल्या दिवशी‎ संमेलनात हरिभाऊ वेरूळकर यांची‎ प्रकट मुलाखात, भजन संगीत मैफल‎ तसेच कविसंमेलन पार पडले. तर‎ रविवारी राज्यस्तरीय निबंध,‎ चित्रकला व रांगाेळी स्पर्धा पार‎ पडली. यानंतर विविध विषयांवर‎ परिसंवाद कार्यक्रम पार पडले. यामध्ये‎ ‘राष्ट्रसंत आणि राष्ट्रपिता यांच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विचारातील समन्वय’ या विषयावर‎ मार्गदर्शन करताना प्रवीण देशमुख‎ म्हणाले, सध्या देशात राष्ट्रपितांवर‎ मोठ्या प्रमाणावर टीका करणारी युवा‎ मंडळी दिसून येत असून ही देशातील‎ सर्वांत मोठी शोकांतिका असून याचे‎ चिंतन होणे गरजेचे आहे. राष्ट्रसंत‎ आणि राष्ट्रपिता या दोघांचे एक‎ वैचारिक नाते होते. दोघांचेही विचार हे‎ मानव हिताचे असल्याचे त्यांनी‎ मांडले. मराठा सेवा संघ प्रवक्ता‎ प्रवीण देशमुख म्हणाले की, राष्ट्रसंत‎ आणि राष्ट्रपिता यांचे विचार हे मानव‎ कल्याण करणारे विचार आहे.‎

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार‎ संपूर्ण विश्वाने स्वीकारले असल्याचे‎ देशमुख म्हणाले. परिसंवादानंतर‎ संमेलनाचा समारोप पार पडला.‎ या वेळी आचार्य हरिभाऊ‎ वेरूळकर गुरुजी यांच्या अमृत‎ महोत्सवी वर्षानिमित्त विनायक‎ सवाई यांना ग्रामगीता जीवन गौरव‎ पुरस्काराने सन्मानित करण्यात‎ आले. तसेच युवराज आढाव यांना‎ विशेष कार्यकर्ता या पुरस्काराने‎ गौरवण्यात आले, तर सप्तखंजिरी‎ वादक प्रबोधन कार्यक्रमाने‎ साहित्य संमेलनाचा समारोप‎ झाला.‎

बातम्या आणखी आहेत...