आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेवळ विदर्भच नव्हे, तर संपूर्ण राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी अहोरात्र धडपडणारे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने राज्यातील भटक्या विमुक्तांच्या आर्थिक उत्थानासाठी असलेल्या विकास महामंडळाबाबत विद्यमान सरकारला घोर उदासीनता असल्याची प्रतिक्रिया तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून हे अधोरेखित होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अर्थसंकल्पात एकीकडे धनगर बांधवांसाठी दहा हजार कोटींची बिनव्याजी कर्जाची तरतूद करण्यात आली आहे, तर दुसरीकडे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून रोजगार करू इच्छिणाऱ्या भटक्या विमुक्त जाती-जमातीतील बेरोजगारांना या अर्थसंकल्पामध्ये कुठलाही वाढीव दिलासा न दिल्याने एक प्रकारे वसंतराव नाईक आणि भटके विमुक्त यांचा तिटकारा शिंदे-फडणवीस सरकारला असल्याचे आरोप तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी केले आहे. बंजारा समाज बांधवाची काशी ‘पोहरादेवी’च्या विकासासाठी पाचशे कोटी रुपयाची तरतूद शासनाने मागे केली. परंतु जगण्यासाठी, रोजगारासाठी, अत्यावश्यक असलेल्या तरतूदींपासून भटक्या विमुक्तांना विद्यमान शासन वंचित ठेवत असल्याचा आरोप नामा बंजारा यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.