आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिनी बचत गटातील सदस्यांचा मेळावा‎:उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

घाटंजी‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. ०८ ‎ ‎ मार्च २०२३ रोजी रिलायन्स फाउंडेशन व विकास‎ गंगा समाजसेवी संस्था यांचे संयुक्त विद्यमाने सोनू ‎ ‎ मंगलम येथे महिला मेळावा पार पडला.‎ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भावनाताई राऊत ‎ ‎ यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्याचे ‎ ‎ उद्घाटन शालिनी जगताप यांनी केले. तर प्रमुख‎ अतिथी म्हणून नरेंद्र खत्री, क्षेत्रीय प्रबंधक विदर्भ‎ कोकण ग्रामीण बँक, जितेंद्र चौधरी जिल्हा‎ व्यवस्थापक रिलायन्स फाउंडेशन वृंदा कांबळे,‎ शैलेश पाल, शाखा व्यवस्थापक विदर्भ कोकण‎ ग्रामीण बँक, रामकृष्ण डुकरे शाखा व्यवस्थापक‎ बँक ऑफ महाराष्ट्र व मार्गदर्शक म्हणून नरेश‎ मेश्राम, मुख्य प्रबंधक भारतीय स्टेट बँक, प्रविण‎ बेंडे उमेद अभियान हे प्रामुख्याने उपस्थित होते.‎

घाटंजी तालुक्यातील बचत गटातील‎ महिलांच्या उत्साहाने पार पडलेल्या या मेळाव्यात‎ ‎ बचत गटाचे उत्कृष्ट व्यवस्थापन व व्यवसाय‎ करणाऱ्या विविध बचत गटांना बँके कडून ८०‎ लाखांपेक्षा जास्त कर्ज वितरण करण्यात आले.‎ उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गटांतील महिलांना‎ मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन‎ गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या‎ शुभेच्छा देत बँकांकडून मिळणारे कर्ज हे‎ महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी तसेच प्रगतीचे‎ मार्ग मोकळे करणारा असल्याने पैशाचा योग्य‎ ठिकाणी व उत्पादक कामासाठी जपून वापर‎ करून कर्जाची वेळेत परतफेड करण्याचे‎ आवाहन विकास गंगा संस्थेचे अध्यक्ष रणजित‎ बोबडे यांनी प्रास्ताविकात केले.‎ महिलांनी बचत गट व्यवसायसोबत‎ उत्पादनाचे मार्केटिंग करण्यावर जोर द्यावा असे‎ भावना राऊत यांनी अध्यक्षीय भाषणात विचार‎ व्यक्त केले.

व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक ते‎ सहकार्य पुरवणार असल्याचा विश्वास जितेंद्र‎ चौधरी यांनी याप्रसंगी महिलांना दिला. महाराष्ट्र‎ बँकेच्या आम्रपाली कावळे, विकासगंगा‎ संस्थेच्या संचालक सविताताई मोहाडे यांनीही‎ आपले विचार व्यक्त केले. यावेळी नीलेश‎ त्रिपाठी उमेद अभियान कक्ष, विलास मालाधारी‎ जिल्हा कार्यक्रम अधिकारी रिलायन्स फाउंडेशन‎ व डॉ. पूजा मानकर, सुभाष वैद्य, सरिता वालकर‎ प्रभाग समन्वयक उमेद अभियान प्रामुख्याने‎ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित‎ गाडबैल, निलेश खडसे व निता सुरस्कर यांनी‎ संयुक्तपणे तर आभारप्रदर्शन विनोद गुजलवार‎ यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...