आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड विधानसभा मतदारसंघात केंद्रीय रस्ते विकास विभागाकडून २१३ कोटींच्या चार रस्त्यांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. या रस्त्यांना मंजूरी मिळताच आता याचे श्रेय वादाचे राजकारणही रंगू लागले आहे. आ. संदीप क्षीरसागर यांनी आपणच हे रस्ते मंजूर करुन घेतल्याचा दावा केला तर, भाजपनेही खा. मुंडेंच्या माध्यमातून रस्ते मंजूर झाल्याचा दावा केला आहे.
पाठोपाठ बाळासाहेबांच्या शिवसेनेनही हे शिंदे सरकारचे यश असल्याचे म्हणत क्षीरसागरांनी श्रेय लाटू नये अशी टिका केली आहे. जिल्ह्यात मागील काही काळापासून कोणतेही विकास काम आले की हे विकास काम आपणच आणल्याचा दावा सर्वपक्षीय नेत्यांकडून केला जात आहे. विशेषत: राज्यातील राजकीय स्थित्यंरानंतर यात वाढ झाली आहे.
शनिवारी बीड विधानसभा मतदार संघातील चऱ्हाटा फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिरापूर धुमाळ ते चऱ्हाटा फाटा, बार्शी नाका ते पांगरबावडी आणि पांगरबावडी ते जरुड फाटा या चार रस्त्यांच्या कामासाठी २१३ कोटींचा निधी मंजूर झाला. यानंतर लगेच राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपण प्रयत्न केल्याने हे रस्ते मंजूर झाल्याचा दावा केला पाठोपाठ भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी खा. प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे व त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत केलेल्या पाठ पुराव्याने हा रस्ता मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन मुळूक यांनीही क्षीरसागर यांनी श्रेय लाटू नये अशी टिका केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.