आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआष्टी गावातील एकाने बेल्टने मारहाण केल्याने त्याच्या तावडीतून सुटून शेतातील विहिरीत उडी घेऊन १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी आंगलगाव (ता. परतूर) येथे घडली आहे. याप्रकरणी एका जणाविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैतन्य साहेबराव खंदारे (१५) असे मृत मुलाचे नाव आहे. आंगलगाव येथील सुरेश रंजित खंदारे याने सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चैतन्य यास बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा चैतन्य याने त्याच्या तावडीतून सुटुन शेताकडे पळत असताना पळतो कुठे सापडल्यावर आणखी मारीन, असे म्हटल्याने चैतन्य याने भीतीने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी साहेबराव भगवान खंदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात सुरेश रंजित खंदारेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.