आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ देणगी:दोनशे उंबऱ्यांच्या गावात‎ तब्बल 31 लाखांचे दान‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघे दोनशे उंबरे असलेल्या‎ गेवराई तालुक्यातील‎ बऱ्हाणपूरकरांनी धाकटी पंढरी‎ अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र‎ नारायण गडावरील आपली श्रद्धा‎ विकासाच्या देणगीच्या माध्यमातून‎ दाखवून दिली. ग्रामस्थांनी वर्गणी‎ करुन तब्बल ३१ लाख रुपयांची‎ देणगी श्री क्षेत्र नारायणगडाचे‎ पीठाधिपती शिवाजी महाराज‎ यांच्याकडे दिली.‎ श्री क्षेत्र नारायण गडाची महती‎ अवघी राज्यभर आहे. भव्य‎ सभामंडप, भक्त निवास उभारले‎ आहे. गडावर शेकडो गाईचा‎ सांभाळ केला जातो. गडाच्या‎ शेतीचाही विकास मोठ्या‎ प्रमाणावर झाला असून उत्पन्नातही‎ वाढ झाली आहे.

गडाच्या‎ माध्यमातून धार्मिक उपक्रमांसह‎ आरोग्य, शिक्षण, सामाजिक आदी‎ विविध क्षेत्रांत काम करण्यावर‎ मठाधिपती शिवाजी महाराज यांचा‎ भर असतो. गडावर नित्यानेच‎ राज्यभरातून हजारो भाविक येत‎ असतात. आषाढी व कार्तिकी‎ एकादशी तसेच इतर मोठ्या‎ कार्यक्रमांना गडावर येणाऱ्या‎ भाविकांचा आकडा लाखांच्या‎ घरात असतो. दरम्यान, गडाच्या‎ विकासासाठी भाविक आपापल्या‎ परीने मदत करत आहेत. जिल्ह्यात‎ व विशेषत: बीड, गेवराई व शिरूर‎ कासार तालुक्यात गडाचे नि:स्सिम‎ भक्त आहेत. गडावरील भक्तीचा‎ प्रत्यय रविवारी आला.‎

गावातील वार्षिक हरिनाम सप्ताहाचे‎ किर्तन श्रीक्षेत्र नारायण गडाचे‎ मठाधिपती शिवाजी महाराज यांचे‎ होते. रविवारी किर्तन झाल्यानंतर‎ गावकरी भक्तांनी जमविलेल्या ३१‎ लाख रुपयांची देणगी रक्कम‎ महाराजांना सुपूर्द करुन आपली‎ गडावरील श्रद्धा दाखवून दिली.‎ शिवाजी महाराज म्हणाले, नगद‎ नारायण महाराजांच्या कृपेने‎ बऱ्हाणपूर वासियांना काही कमी‎ पडणार नाही. गडावर भाविकांना‎ विविध सोयी सुविधा उपलब्ध‎ करुन दिल्या जात आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...