आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना वडवणी तालुक्यातील मोरवड मध्ये शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी प्रल्हाद राजाभाऊ शेंडगे (३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना दोन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्यावर शासकीय बँका आणि सेवा सोसायटीचे कर्ज आहे. त्यातच आईचे आजारपणही सुरु आहे.
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळ्याने ते नैराश्यात होते. शुक्रवारी रात्री जेवण करुन ते शेतातून चक्कर मारुन येतो म्हणून गेले मात्र बराच वेळ झाला तरी ते परत येत नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली. विहिरीत उडी घेत त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. रात्रभर विहिरीतील पाणी उपसा करुन शनिवारी पहाटे त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. प्रल्हाद यांच्या पश्चात पत्नी, आई, वडिल, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.