आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस पोहोचली‎:डांबरीकरण झाले अन् दोन गावांतून स्वातंत्र्यानंतर प्रथमच धावली बस‎

धारुर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याला ७५ वर्ष उलटली तरी‎ तालुक्यातील काळ्याचीवाडी आणि मांजर‎ कडा तांडा या वाड्यावर बस पोहोचली‎ नव्हती. या गावासाठी पूर्वी गाडी रस्ता होता‎ परंतु मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये‎ पंतप्रधान सडक योजनेतून डांबरी रस्ता‎ करण्यात आल्यामुळे स्वातंत्र्यानंतर या‎ गावातून आता लालपरी धावू लागली आहे.‎ गावात पहिल्यांदा बस आल्यानंतर‎ गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.‎ धारूर तालुका हा बालाघाटाच्या‎ डोंगररांगांनी व्यापलेला आहे.

गावासाठी‎ मजबूत रस्ते नसल्यामुळे दळणवळणाच्या‎ सुविधा पाहिजे तशा झालेल्या नाहीत. परंतु‎ आता हळूहळू यामध्ये सुधारणा होऊन ''‎ डोंगराच्या कुशीत वसलेले तांडे, वस्त्या, गावे‎ ही डांबरी रस्त्याने तालुक्याला जोडण्यात येत‎ आहेत.‎ तालुक्यातील कळ्याचीवाडी, मांजरकडा‎ तांडा ही गावे बालाघाटाच्या डोंगर कुशीत‎ वसलेली आहे. येथे दळणवळणाची सुविधा‎ नसल्यामुळे पायवाट किंवा गाडी‎ रस्त्याशिवाय मजबूत रस्ता नव्हता.

पंधरा वर्षे‎ नंतर या ठिकाणी साधारण डांबरीकरण‎ करण्यात आले होते परंतु या गावासाठी‎ जाणाऱ्या नदी नाल्यावर पूल नसल्यामुळे‎ पावसाळ्यात येथील ग्रामस्थांचे दळण‎ वळणासाठी मोठे हाल होत होते .या ठिकाणी‎ पंतप्रधान सडक योजनेतून भोगलवाडी ते‎ सावरगाव असा आठ कोटीच्या जवळपास‎ पुलासह डांबरीकरणाचा रस्ता मंजूर झाला‎ होता. या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे.

या‎ रस्त्यावरून भोगलवाडी सह काठेवाडी,‎ काळ्याचीवाडी, मांजरकडा तांडा,‎ पिंपरवडा, असोला ही गावी जोडण्यात‎ आलेली आहेत. रस्ता झाल्यामुळे येथील‎ नागरिकांनी बस सुरू करण्याची मागणी‎ करण्यात आली होती. एक फेब्रुवारी‎ बुधवारपासून धारूर, असोला, पिंपरवाडा,‎ काळ्याचीवाडी, भोगलवाडी, काठेवाडी‎ मार्गे तेलगाव ही बस सुरू करण्यात आलेली‎ आहे. ही बस प्रथमच मांजरकडा तांडा आणि‎ काळ्याचीवाडी या गावातून जात आहे.‎

प्रथमच लालपरी धावली‎ पंधरा वर्षांपूर्वी या रस्त्यावर मोठे नाले असल्यामुळे‎ दळणवळण करणे कठीण होते . आता लहान मोठे पुल‎ उभा करण्यात डांबरीकरण झाले आहे . दोन दिवसापासून‎ बस सुरू करण्यात आली . परमेश्वर तिडके , ग्रामस्थ‎

आता दळणवळणाची सोय झाली‎ धारूर -पिंपरवाडा - भोगलवाडी या मार्गावरून पूर्वी‎ कधीही बस जात नव्हती . आता रस्ता झाल्यामुळे आम्ही‎ बस सुरू करण्यात आलेली आहे .भोगलवाडी तसेच‎ काळेवाडी येथील ग्रामस्थांना आता जवळचे अंतर झाले‎ आहे . - शंकर स्वामी , आगर प्रमुख धारूर‎

बातम्या आणखी आहेत...