आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भाजप जाती-जातीत भांडणं लावणारा पक्ष : देशमुख‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस पक्ष हा एक विचार आहे.‎ काँग्रेस न संपणारा पक्ष आहे,‎ भले-भले संपले पण काँग्रेस संपली‎ नाही, असे सांगत भाजपकडून‎ जातीपातीचं आणि धर्माचं‎ राजकारण करून समाजात द्वेष‎ पसरवण्याचे काम सुरू आहे. येत्या‎ काळात जनता आता काँग्रेसच्या‎ पाठीशी खंबीरपणे उभी राहणार‎ आहे. नुकत्याच झालेल्या‎ निवडणुकीत बदल दिसून आला‎ आहे.

काँग्रेसने विकासाचे‎ राजकारण केलं असल्याचे‎ प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष‎ राजेसाहेब देशमुख यांनी केले.‎ शहरातील बालेपीर भागात ‘‎ हाथ से हाथ जोडो’ अभियानाच्या‎ शुभारंभप्रसंगी बोलत होते. या वेळी‎ ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाला‎ गणेश बजगुडे, परवेज कुरेशी,‎ नारायण होके, मालोजी गलांडे,‎ दत्ता भाऊ गलांडे, अशोक‎ देशमुख, जाधव सर, बहादूरभाई,‎ अफरोज तांबोळी सय्यद फरहान,‎ शेख मोहसीन, कदर बाबा, हनुमान‎ घोडके, अमजद कुरेशी, कर्मा‎ चाऊस यांच्यासह आदी‎ कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.‎

देशमुख म्हणाले, सध्याचं‎ भाजपचे सरकार भांडवलधार्जीने‎ आहे. गांधींचे विचार रुजवणे‎ गरजेचे आहे. सर्वसामान्यांचे‎ सरकार आणण्यासाठी राहुल गांधी‎ यांचे हात बळकट करणे गरजेचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे. नुकतेच विधान परिषदेच्या‎ निवडणुकीत महाआघाडीच्या‎ बाजुने जनतेने कौल दिला आहे.‎ येत्या काळात देशातील जनता‎ नक्कीच राहुल गांधी यांच्या‎ पाठीशी खंबीरपणे उभी राहील,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असं सांगत काँग्रेस हा एक विचार‎ आहे, आजपर्यंत काँग्रेसने जे काही‎ केलं आहे ते जनतेचं हित‎ डोळ्यांसमोर ठेवून काम केलं‎ आहे. भले भले संपले पण काँग्रेस‎ पक्ष संपला नाही, भाजपकडून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जातीपातीचे राजकारण करून‎ समाज विभागण्याचे काम केलं‎ जाऊ लागलं. येत्या कार्यकाळात‎ काँग्रेसच देशाचे नेतृत्व करील,‎ असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त‎ केला.‎

बातम्या आणखी आहेत...