आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयात धाव:केकतपांगरी प्रकरणात भाजपचे‎ पोलिस अधीक्षकांना निवेदन‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई तालुक्यातील केकतपांगरी येथील‎ ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान‎ पोलिसांकडून नागरिकांना मारहाण करत‎ नागरिकांवर गुन्हा दाखल करून नाहक त्रास‎ देण्यात आला. त्यानंतर नागरिकांकडून‎ न्यायालयात धाव घेत जामीन मिळवला.‎ परंतु, गेवराई पोलिसांकडून गावामध्ये दहशत‎ निर्माण करण्यासाठी वारंवार गावात फेऱ्या‎ मारत गावातील तरुणांना चौकशीसाठी‎ ताब्यात घेले जात आहे. पोलिसांकडून होत‎ असलेला नाहक त्रास तत्काळ थांबविण्याची‎ मागणी बीड जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांनी‎ पोलिस अधीक्षक ठाकूर यांना भेदून निवेदन‎ देत केली.‎ गेवराई तालुक्यातील केकतपांगरी‎ निवडणुकीदरम्यान हरिलाल नाईक तांडा,‎ रामुनाईक तांडा येथील मतदार केंद्रावर १८‎ डिसेंबर २०२२ रोजी मतदानाच्या दिवशी‎ इव्हीएम वारंवार बंद पडत असल्याने‎ नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.‎

मतदान प्रक्रियेचा कालावधी संपल्यानंतरही‎ मशीनच्या बिघाडीमध्ये उशिरापर्यंत मतदान‎ प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती. मात्र‎ सुरळीत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये‎ पोलिसांकडून जमावावर विनाकारण अमानुष‎ मारहाण करण्यास सुरूवात केल्याने‎ नागरिकांचा रोष अनावर होऊन पोलिस‎ आणि नागरिकांमध्ये वाद झाला होता.‎ तत्कालीन पीआय रवींद्र पेरगुलवार यांनी गुन्हे‎ नोंद केले होते. यात न्यायालयाने जामीन‎ मंजूर केल्यानंतरही पोलिसांकडून अज्ञातांचा‎ शोध घेत असल्याचे सांगत गावामध्ये दहशत‎ निर्माण करत असल्याने नागरिक भयभीत‎ होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.‎ यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी जि.‎ प. सदस्य प्रा. पी. टी. चव्हाण, जिल्हा संघटन‎ सरचिटणीस देविदास नागरगोजे, भाजप‎ अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष अजय सवाई,‎ भाजप विमुक्त-भटके आघाडी बीड‎ जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव, शांतिनाथ‎ डोरले, महेश सावंत, संतोष चव्हाण आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...