आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वच्छतेची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच होत असते‎ ; समाजशास्त्र विषयाच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन‎

गेवराई‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात स्वच्छता ही मोठी‎ समस्या बनलेली आहे.‎ अस्वच्छता ही सामाजिक,‎ आर्थिक, सांस्कृतिक या‎ घटकांना प्रभावित करते.‎ परिणामी राष्ट्राच्या विकासात‎ त्यामुळे अडथळा निर्माण होतो.‎ म्हणून प्रत्येक व्यक्तीने‎ स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात‎ करायला हवी, असे प्रतिपादन‎ प्राचार्य डॉ.रजनी शिखरे यांनी‎ केले.‎ गेवराई मराठवाडा शिक्षण‎ प्रसारक मंडळ संचलित‎ र.भ.अट्टल महाविद्यालयात‎ आयसीएसएसआर, नवी दिल्ली‎ व समाजशास्त्र विभाग र. भ.‎ अट्टल महाविद्यालय, गेवराई‎ यांच्या संयुक्त विद्यमाने‎ ‘स्वच्छतेचा समाजावर होणारा‎ परिणाम'' (स्वच्छ भारत, स्वस्थ‎ भारत) या विषयावर‎ एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ या चर्चासत्राच्या उद्घाटक‎ म्हणून बीड येथील बलभीम‎ महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.‎ रजनी शिखरे उपस्थित होत्या.‎

याप्रसंगी बीजभाषक म्हणून‎ संशोधक, लेखक‎ पी.एन.ग्रॅज्युएट कॉलेज,‎ लखनऊ येथील समाजशास्त्र‎ विभाग प्रमुख प्रा.विनोद चंद्रा,‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ मराठवाडा विद्यापीठाच्या माजी‎ समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा‎ माजी सिनेट सदस्य प्रा.स्मिता‎ आवचार, सरस्वती भुवन‎ महाविद्यालय, छत्रपती‎ संभाजीनगर येथील समाजशास्त्र‎ विभाग प्रमुख प्रा.संदीप चौधरी,‎ माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ,‎ स्वच्छ भारत मिशन तथा‎ जनसंपर्क अधिकारी, जिल्हा‎ परिषद, जालना येथील भगवान‎ तायड, महाविद्यालयाचे प्र.‎ प्राचार्य विजय सांगळे, उपप्राचार्य‎ डॉ. प्रशांत पांगरीकर यांच्यासह‎ चर्चासत्रासाठी गेवराई‎ तालुक्यातील तब्बल शंभर‎ ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य,‎ महाराष्ट्रातून वेगवेगळ्या‎ महाविद्यालयातून आलेले‎ प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी‎ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती‎ होती. कार्यशाळेचे प्रस्ताविक‎ संयोजक तथा समाजशास्त्र‎ विभाग प्रमुख डॉ. रेवणनाथ‎ काळे यांनी केले. सूत्रसंचालन‎ डॉ. समाधान इंगळे यांनी तर‎ आभार डॉ. संदीप वंजारी यांनी‎ मानले.‎

बातम्या आणखी आहेत...