आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हवामान बदल, हरभरा पिकावर 15% मर रोगाचा प्रादुर्भाव‎

शिरुरकासार‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूर तालुक्यातील शेतकरी पुन्हा एक वेगळ्या‎ संकटात सापडला आहे. तालुक्यात रब्बी पिक म्हणून‎ मोठ्या प्रमाणात हरभरा पिक घेतला जातो. मात्र हरभरा‎ पिकावर सतत ढगाळ वातावरण अवकाळी पाउस‎ आणि थंडी गायब होऊन बदलत चाललेल्या‎ वातावरणाचा फटका हरभरा पिकाला बसत आहे.‎ त्यामुळे हरभरा पिकावर मर रोग येत आहे.यामुळे‎ हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट होणार असून ६६६२‎ हेक्टर वरील हरभरा पिक यामुळे धोक्यात आले आहे.‎ पेरणीनंतर उगवलेले झाड जागीच पिवळे पडून मरत‎ आहे.

दरवर्षीच्या तुलनेत मर रोगाचे प्रमाण जास्त‎ आहे.खरीप पिक अतिपावसाने गेल्यानंतर रब्बी पिकही‎ जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी‎ पुन्हा चिंतेत आहे.यावर्षी मर रोगाचे प्रमाण १० ते १५ टक्के‎ असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.‎ पर्यायाने उत्पादनामध्ये ४०% घट होणार असल्याची‎ शंका विभागामार्फत वर्तवली जात आहे.त्यामुळे‎ महागडी फवारणी करुन देखील फरक पडत नसल्याने‎ शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

हरभरा पिकात‎ वर्षानुवर्ष सातत्याने रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात‎ मोठी घट होऊ लागली आहे यामुळे तालुक्यात या वर्षी‎ प्रथमच शेतकऱ्यांनी राजमा या पर्यायी पिकाला पसंती‎ दिली असून ४४८हेक्टरवर राजम्याची रब्बी हंगामात‎ पेरणी झाली आहे कमी खर्चात जास्तीचे उत्पादन‎ राजमह्यामधून शेतकऱ्यांना मिळत आहे.‎ रब्बी हवामानात सातत्याने होणारे बदल, व पिकावर‎ पडणारी रोगराई, रासायनिक खताचा अतिवापर व‎ जमिनीत असलेल्या स्फुरदची कमतरता यामुळे‎ पिकावर मर रोगाचे प्रमाण वाढते आहे, पारंपारिक‎ पद्धतीने वारंवार एकाच ठिकाणावर दरवर्षी हरभरा‎ पिकाची पेरणी पद्धती यामुळे उत्पादनात घट होण्याची‎ शक्यता आहे.‎ हरभऱ्यावर अशा प्रकारे रोगांचा प्रादूर्भाव होत आहे.‎

हरभरा पेरणीत घट‎ हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये घट होत‎ असल्याने व महागडे औषधाची‎ फवारणी करून देखील हरभरा‎ रोगावर नियंत्रण प्राप्त होत नसल्याने‎ तालुक्यातील शेतकऱ्यांनी या वर्षी‎ २९८हेक्टर क्षेत्रातील हरभरा‎ पेरणीला बगल दिली आहे.‎

मंडळ निहाय‎ पेरणी (हेक्टर मध्ये)‎ शिरूर कासार १०१०‎ गोमळवाडा १००३‎ ब्रम्हनाथ येळंब ९५२‎ खालापुरी ११४२‎ रायमोहा १ ५५७‎ तिंतरवणी ९९८‎ स्फुरदचे प्रमाण कमी झाल्याने बुरशी‎ शेत जमिनीतील स्फुरदचे प्रमाण कमी झाल्यास जमिनीमध्ये‎ बुरशीजन्य आजारामध्ये वाढ होत असून याचा फटका पेरणी‎ केलेल्या पिकांना बसत असतो यामुळे शेतकऱ्यांनी महागडी‎ औषधे फवारणी न करता स्फुरद व बुरशी यावर नियंत्रण प्राप्त‎ करणारी कीटकनाशके फवारावीत.‎ रवींद्र नेटके, तालुका कृषी अधिकारी शिरूर कासार‎

उत्पन्न कमी होणार‎ मागील वर्षी मी दोन एकर क्षेत्रामध्ये हरभरा पेरणी केली‎ होती यामधून मला दीड लाख रुपयाचे उत्पादन मिळाले‎ यावर्षी मी तीन एकर क्षेत्रात हरभरा पेरलेला आहे परंतु‎ रोगाच्या प्रादुर्भावामुळेउत्पादन कमी होण्याची स्थिती निर्माण‎ झाली आहे. विनायक यादव, शेतकरी आर्वी‎

बातम्या आणखी आहेत...