आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकापूस हंगाम सन २०२२-२३ साठी भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) मार्फत कमर्शियल दराने कापूस खरेदीचा शुभारंभ सीसीआय केंद्रप्रमुख हेमंत ठाकरे यांच्या हस्ते झाला. माऊली कॉटन गेवराई येथे गुरुवारपासून ही खरेदी सुरू करण्यात आली. बाजार समिती सचिव गंगाभिषण शिंदे यांनी सांगितले की, यंदाच्या कापूस हंगामासाठी केंद्र शासनामार्फत कापूस हमीभाव जाहीर झालेले आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा जास्त दराने सध्या कापुस विक्री होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला जास्तीत जास्त भाव मिळावा या हेतूने भारतीय कपास निगम लिमिटेड, भारत सरकार हे कमर्शियल कापुस खरेदी मध्ये उतरले आहेत. शेतकऱ्यास आठ हजार चारशे प्रति क्विंटलचा भाव देण्यात आला आहे.
सीसीआय हे चालू बाजार भावाने कापुस खरेदी करणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापुस माउली जिनिंग, गेवराई येथे विक्रीस आणावा व येताना आधारकार्ड सोबत आणावे, असे आवाहन गेवराई बाजार समिती सचिव गंगाभिषण शिंदे यांनी केले आहे. या उद्घाटन प्रसंगी अर्जुन दवे, उपमहाप्रबंधक, औरंगाबाद यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती होती. तसेच बंडू मोटे, अरुण भाडाईत, बाजार समितीचे स्वप्निल सुरवसे, राम साळुंखे, धनाडे मामा, जमील तांबोळी, आशफाक तांबोळी, बापू धोत्रे इत्यादी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.