आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी प्रदान:स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांत ताणतणाव वाढतो;‎ सकारात्मकतेने पुढे जाण्याचा प्रयत्न करा‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी जीवनाकडे सकारात्मक‎ दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे.‎ अभ्यासक्रमाबरोबरच सृष्टीतील‎ अनेक गोष्टीं कडून शिकायला मिळते.‎ सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने‎ ताण-तणाव वाढत आहे.प्रत्येक‎ कामात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून‎ मार्गक्रमण करणे आवश्यक‎ आहे.येणाऱ्या समस्यांचा सामना करून‎ पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी नो‎ कम्प्लेंट डे प्रत्येक दिवशी साजरा‎ करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन‎ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा‎ विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.गणेश‎ मंझा यांनी केले.

केएसके‎ महाविद्यालयात ते प्रमुख अतिथी‎ म्हणून बोलत होते.‎ बीड येथील केशरबाई सोनाजीराव‎ क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व‎ वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी‎ आयोजित दिक्षांत समारंभाच्या‎ अध्यक्षस्थानी नवगण शिक्षण संस्थेचे‎ सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर होते.‎ यावेळी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक‎ डॉ. गणेश मंझा यांची प्रमुख उपस्थिती‎ होती. व्यासपीठावर संस्थेच्या‎ उपाध्यक्षा डॉ.दीपा क्षीरसागर, प्रभारी‎ प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर,‎ उपप्राचार्य डॉ.संजय पाटील‎ देवळाणकर, उपप्राचार्य डॉ.शिवाजी‎ शिंदे, पदव्युत्तर संचालक डॉ.सतीश‎ माऊलगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे‎ पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर,‎ नगरसेवक गणेश वाघमारे यांची‎ उपस्थिती होती.‎

महाविद्यालयातील पदवी,पदव्युत्तर‎ व विद्यावाचस्पती प्राप्त पदवीधारक‎ जवळपास १५० विद्यार्थ्यांना उपस्थित‎ मान्यवरांच्या हस्ते पदवीचे‎ सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले.‎ यावेळी डॉ. मंझा पुढे म्हणाले की, के.‎ एस. के.महाविद्यालयाची उत्तरोत्तर‎ प्रगती होत आहे.‎ विद्यापीठातून प्रत्येक वर्षी एक लाख‎ विद्यार्थी पदवी घेत आहेत. नोकऱ्यांच्या‎ अभाव असला तरी विद्यार्थ्यांनी‎ आपल्या अंगी असलेल्या कौशल्याचा‎ विकास करणे ही काळाची गरज‎ असल्याचे त्यांनी नमूद करून‎ पदवीधारकांना शुभेच्छा दिल्या.‎ संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण‎ क्षीरसागर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा‎ दिल्या.‎

दीक्षांत समारंभाचे प्रास्ताविक प्रभारी‎ प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर यांनी‎ केले प्रमुख अतिथींचा परिचय‎ डॉ.सोनाजी गायकवाड यांनी दिला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.शिवाजी‎ शिंदे यांनी केले व आभार उपप्राचार्य‎ डॉ.संजय पाटील देवळाणकर यांनी‎ मानले. या दीक्षांत समारंभाचे समिती‎ प्रमुख डॉ.अन्सार उल्ला खान‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांच्यासह प्राध्यापकांनी हा समारंभ‎ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.‎ कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक‎ व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठया‎ संख्येने उपस्थित होते.‎

जे ज्ञान प्राप्त करतील त्यांनाच संधी : क्षीरसागर‎उपाध्यक्ष डॉ.दीपा क्षीरसागर यावेळी म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी सातत्याने शिकत राहणे‎ आवश्यक आहे.आजच्या काळात ज्ञान हेच भांडवल असल्याने जे ज्ञान प्राप्त करतील‎ त्यांना त्यांच्या आयुष्यात संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत‎ महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला.‎

बातम्या आणखी आहेत...