आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान‎:गारपिटीने दिंद्रुडला पिकांचे नुकसान‎

दिंद्रुड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड मंडळाला‎ शनिवारी (दि.१८) पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून‎ काढले. तसेच परिसरातील देवदहिफळ, चाटगाव,‎ हिंगणी बु. व खु., कांदेवाडी, आमला, देवठाणा,‎ जैतापूर, चिखली, फकीर जवळा, कासारी बोडखा,‎ कारी गावांमध्ये आलेल्या अवकाळीमुळे मोठमोठ्या‎ गारांनी झोडपून काढल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात‎ नुकसान झाले आहे. यासोबतच गेवराई तालुक्यातील‎ आम्ला, वाहेगाव परिसरातील गावात शुक्रवारी रात्री‎ वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.‎ यामध्ये गहू, ज्वारी पिके आडवी झाली.

तर हरभरा,‎ खरबूज, टरबूज या पिकांचे देखील अतोनात नुकसान‎ झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.‎ दरम्यान तालुक्यात मागील तीन दिवसांपासून‎ अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्याने‎ शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके आडवी‎ झाली आहेत. ‎केज तालुक्यातील बहुतांश गावात‎ मेघगर्जना आणि विजेच्या गडगडाटासह जोरदार‎ अवकाळी पाऊस पडला असून काही भागात गारपीट‎ ही झाली आहे. पावसाने रब्बीच्या पिकांना फटका‎ बसला असून टरबूज, खरबूजसह फळबागांचे ही‎ नुकसान झाले आहे. तालुक्यात मागील दोन‎ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून सुर्यदर्शन‎ झालेले नाही. शुक्रवारी मस्साजोग व नांदूरघाट‎ मंडळातील अनेक गावांत अवकाळी पावसाने‎ जोरदार हजेरी लावली होती. तर शनिवारी ही दुपारी‎ विडा आणि युसुफवडगाव मंडळात जोरदार पावसाने‎ हजेरी लावली.‎

बातम्या आणखी आहेत...