आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:शेतकऱ्यांना भरपाई‎ देण्याची मागणी‎

बीड‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पावसामुळे नुकसान‎ झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने‎ नुकसान भरपाई द्यावी व ओबीसी‎ समाजाचे प्रश्न सोडवावेत, अशी‎ मागणी काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे‎ जिल्हाध्यक्ष प्रा. संभाजी जाधव व‎ सहकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे‎ निवेदनाद्वारे केली आहे.‎ दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,‎ पेन्शन योजना लागू करून बिहार‎ राज्यांप्रमाणे ओबीसीची जातगणना‎ करावी. तसेच ओबीसी मागासवर्गीय व‎ अल्पसंख्याक समाजाशी संलग्न‎ विविध कर्जमाफी करून शासन‎ दरबारी कोर्टात असलेल्या केसेस‎ माघारी घ्याव्यात, महात्मा फुले व‎ सावित्रीबाई फुले आणि आण्णा भाऊ‎ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर‎ करावा, महाविकास आघाडी सरकार‎ काळात जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी‎ विद्यार्थांना शासकीय वसतिगृह सुरू‎ करण्याच्या निर्णयाची अंबलबजावणी‎ करावी अन्यथा १५ मे २०२३ रोजी‎ राज्यभर आंदोलन करण्यात येईल.‎ यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन‎ देण्यात आले.‎

यावेळी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी‎ काँग्रेसचे सरचिटणीस वसंत मुंडे,‎ शिरूर (का) तालुका काँग्रेसचे‎ अध्यक्ष रमेश सानप, बीड शहर‎ काँग्रेसचे अध्यक्ष परवेझ कुरेशी,‎ महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर सेलचे राज्य‎ समन्वयक डॉ. जयप्रकाश आघाव,‎ किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल‎ पाठक, युवक काँग्रेसचे कानिफनाथ‎ विघ्ने, गणेश जवकर, शामसुंदर‎ जाधव, सय्यद फरहान, भारत ढवारे,‎ मोहसीन शेख, अमजद शेख, सय्यद‎ अल्ताब, मुजमील कुरेशी, लहुदास‎ तांदळे, आरिफ शहा, संतोष‎ निकाळजे, विष्णु मस्के, बाळासाहेब‎ बडे यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...