आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरळीच्या डॉ.शामाप्रसादजी मुखर्जी उड्डाणपुलाने धूलिवंदनाच्या पूर्वसंध्येला दोघांचा बळी घेतला. मध्यरात्री तालुक्यातील दगड वाडी येथील रेल्वे प्रवाशाला सोडुन परळीकडे येत असताना राख वाहतुक करुन परळी बाहेर जाणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात ऑटो चालक जागीच ठार झाला तर सोबतच्या युवकाचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यु झाला. ८ मार्च रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मालेवाडी येथील राजेश पोटभरे हा २५ वर्षीय युवक परळीत अॅटो चालवून आई-वडिलासह शाहुनगर वस्तीत राहातो. तो रात्रीच्या वेळी रेल्वे परिसरात रिक्षा चालवतो. बुधवारी पहाटे शिर्डी-काकीनाडा एक्स्प्रेसमधून उतरलेले काही प्रवासी त्याला मिळाले. प्रवाशांना सोडण्यासाठी ८ कि. मी. लांब जायचे म्हणुन मित्र आशिष ताटे यास सोबत घेतले पहाटे २ ते ३ च्या दरम्यान प्रवाशी सोडुन परत येत असताना उड्डाणपुलावर भरधाव टिप्परने जोराची धडक दिली.
यात ॲटोचा चक्काचूर झाला.या अपघातात पोटभरे याचा जागीच मृत्यू झाला तर ताटे याचा अंबाजोगाई येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला. बायपास पूर्ण, वाहतूक बंद परळी शहरातून होत असलेली जड वाहनांची वाहतुक ईटके कॉर्नर येथुन टोकवाडी जवळुन अंबाजोगाई मार्गाकडे वळविणारा परळी बायपास हा चार पदरी मार्ग पुर्ण झालेला आहे.परंतु या मार्गावरुन अद्याप वाहतुक वळवण्यात येत नसल्याने परळीच्या उड्डाणपुलावर वाहतुक कोंडी,अपघात नित्याचे बनले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.