आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील बायपास ते बायपास रस्त्याचे काम सध्या सुरू आहे.या रस्त्याचे काकू-नाना हॉस्पिटल पासून ते शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचे काम आटोपले आहे.आता पुतळ्याच्या चारही बाजुंच्या रस्ताकामाला सुरूवात करण्यात येणार आहे.या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी रस्ताकामाच्या काळात व्यवस्थापनाच्या संदर्भात नियोजन केले. शहरातून दोन्ही बायपास जोडणाऱ्या बायपास ते बायपास रस्त्याचे काम सुरू असून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.पुढील २ ते ३ आठवड्यांमध्ये पुतळ्याजवळील काम पूर्ण होण्याचे नियोजन आहे.शहरातील मध्यवर्ती असा हा शिवाजी महाराज चौक आहे.
याठिकाणी चारही बाजूंनी वाहतूक सतत सुरू असते.येथील रस्त्याचे काम सुरू असताना नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पर्यायी रस्त्याचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी आ.संदीप क्षीरसागर स्वतः रस्त्यावर येऊन वाहतूक पोलीस अधिकारी,राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांच्यासोबत चर्चा केली व संबंधितांना योग्य त्या सुचना केल्या.या रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला सुचना केल्या असून हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. रस्ता कामासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार संदीप क्षीरसागर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.