आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मिलिंद विद्यालय ते अंबेवेस रस्त्याचे काम तीन वेळा करूनही रखडलेलेच आहे. अंबेवेसकडील बाजुने हा रस्ता खोदून ठेवल्याने या भागातील नागरिकांचे राणी लक्ष्मीबाई टॉवरकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने हाल होत आहेत. शहरातील मिलिंद विद्यालयासमोरून अंबेवेसकडे येणारा रस्ता रहदारीचा आहे. शहरातील वैद्यनाथ मंदिर, नेहरू चौक, मोंढ्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होतो.
रस्त्यावर भाजी मंडई असल्याने परळीत येणारे शेतकरी या रस्त्याचा वापर करतात. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असुन विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे तीन वेळा काम करण्यात आले. तरीही रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले नाही. मागील चार दिवसांपासून नालीकामसाठी रस्ता खोदून ठेवला आहे. हे काम पूर्ण करून रस्ता पूर्ववत करावा अन्यथा पालिकेविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपचे कार्यकर्ते सुशील हरंगुळे यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.