आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईश्वराचे नामस्मरण करणे हे पुण्याचे काम आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ईश्वराच्या साधनेला वेळ द्यावा. नामसंकीर्तन हा भक्तीचा सोपा मार्ग असून त्यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन पांडुरंग महाराज मुंडे यांनी केले. धारूर शहरातील दत्त मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही चातुर्मास समाप्तीनिमित्त काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. पांडुरंग महाराज मुंडे यांच्या अमृततुल्य अशा वाणीतून दत्त मंदिर येथे कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला.
यावेळी तालुक्यातील कीर्तनकार प्रकाश महाराज साठे, तबलावादक भैरू महाराज शिनगारे, अंकुश दराडे, उद्धव ठाकरे, महादेव शिनगारे गुरुजी, सुरेश शिनगारे, अश्रूबा शिनगारे, माणिक शेळके, कृष्णा शेळके, राम साखरे, अंकुश साखरे, गणेश शेळके, श्याम शिनगारे, अंबादास ढगे, चंद्रकांत फुके यांच्यासह दत्त मंदिर भजनी मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. किर्तन सेवा संपूर्ण झाल्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.