आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड येथे गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस झालेल्या जिल्हास्तरीय इज्तेमामध्ये जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने १६ हजार ७७२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली. दाेन दिवसीय या सोहळ्यात लाखोंच्या संख्येत नागरिक येणार असल्याने या ठिकाणी आजार उद्भवू नयेत यासाठी आरोग्य तपासणी मोहिम हाती घेतली होती.
जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यासाठी तीन पथके, जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने एक पथक, आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यामार्फत एक पथक असे एकूण पाच पथके तयार करण्यात आले होते. या पथकांनी साथीचे आजार उद्भवू नयेत, जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, सांडपाणी व्यवस्थापन व्हावे यासाठी परिसर आणि विशेष स्वच्छता या अनुषंगाने काम केले. यामध्ये दोन दिवसांत पाण्याच्या १८९ ओटी चाचण्या करण्यात आल्या सर्व चाचण्यांचा अहवाल चांगला आल्याने हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष होता. तर, सांडपाण्याचीही विल्हेवाट लावली गेली. जिल्हा रुग्णालयाचे डॉ. शाफे यांच्या नेतृत्वात आरोग्य पर्यवेक्षक एस. डब्ल्यू मांडवे, आरोग्य सहायक एम. एस. बागलाने, आरोग्य सहायक साजिद कादर, आरोग्य सहायक सय्यद जुबेर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग यांचा समावेश हाेता. दाेन दिवसांत या पथकांनी १६ हजार ७७२ जणांची आरोग्य तपासणी केली. यासाठी तीन झोन तयार केले गेले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.