आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:बालकांच्या अपहरण प्रकरणात आणखी चौघे अटकेत‎

बीड‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशासाठी अल्पवयीन मुलांचे‎ अपहरण करून विकणाऱ्या‎ आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश‎ केल्यानंतर परभणी पोलिसांनी या‎ प्रकरणातील सहभागी आणखी चार‎ आरोपींना अटक केली.‎ आरोपींकडून एका अपहृत‎ बालकाचा शोध लागला आहे. रुद्रेश‎ हरिश्‍चंद्र वारंग (रा. ठाणे), सुमन‎ पुडी लक्ष्मी दुर्गा (रा. कोकाडपल्ली,‎ हैदराबाद), सिलमप्रभा अनिल (रा.‎ भद्रादी कोथागुडेम) इटी त्रिनाथ‎ व्यंकटराव (रा. विजयवाडा) अशी‎ अटक केलेल्या आरोपींची नावे‎ आहेत, अशी माहिती परभणी‎ पोलिसांनी दिली.‎

परभणीतील अजमेरी कॉलनी‎ येथील रहिवासी मोहंमद युसूफ‎ मोहंमद हैदर यांनी फेब्रुवारी २०२२‎ मध्ये कोतवाली पोलिस ठाण्यात‎ तक्रार दिली होती. यात चार वर्षे ३‎ महिन्यांच्या मुलांचे अपहरण‎ झाल्याचे म्हटले होते.

सफिया बेगम‎ अर्शद खान यांनीही त्यांच्या आठ‎ वर्षांच्या मुलाचे अज्ञात व्यक्तीने‎ अपहरण केल्याची तक्रार १ मार्च‎ २०२२ रोजी दिली होती. पोलिसांनी या‎ प्रकरणाचा छडा लावत दोन्ही‎ गुन्ह्यांतील बालकाचे अपहरण‎ अजमेरी कॉलनीतील महिला‎ सुलताना ऊर्फ परवीनबी शेख सादेक‎ अन्सारी हिने केल्याचे तपासात स्पष्ट‎ झाले. तिला बहीण नूरजहाँ बेगम‎ मोहंमद इब्राहिम शाकेर व तिचा‎ विधिसंघर्षग्रस्त बालक मदत करत‎ होते. पोलिसांनी यापूर्वी दहा‎ आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत‎ त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे‎ आणखी चार आरोपींना ताब्यात‎ घेण्यात आले. त्यात दोन महिला व‎ दोन पुरुष आहेत. आरोपीकडून दोन‎ बालकांचा पोलिसांनी शोध लावून‎ ताब्यात घेतले आहे. त्यांना‎ बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले‎ केले असल्याची माहिती परभणी‎ पोलिसांकडून देण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...