आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:गांधी हे केवळ नाव नसून ते एक‎ अजरामर राहणारे तत्त्वज्ञान आहे‎ ; गांधी फाउंडेशनचे संकेत मुनोत यांचे प्रतिपादन‎

अंबाजोगाई‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्र घडविण्यात महात्मा गांधीचा वाटा‎ मोठा होता. महात्मा गांधींच्या प्रेरणेने‎ भारत देश आजही संपूर्ण जगभरासाठी‎ आदर्श देणारा ठरलेला आहे. गांधी हे‎ फक्त नाव नसून ते एक तत्वज्ञान आहे,‎ तो एक विचार आहे. कितीही काळ गेला‎ तरी हा विचार अजरामर राहणार आहे,‎ असे प्रतिपादन गांधी फाउंडेशनचे‎ समन्वयक संकेत मुनोत यांनी केले.‎ जिजामाता महिला औद्योगिक‎ उत्पादक सहकारी संस्था धानोरा (बु)‎ आयोजित राज्यस्तरीय बहुभाषिक‎ परिवर्तन साहित्य संमेलनात ''गांधी ते‎ गांधी'' हा परिसंवाद संपन्न झाला.

या‎ परिसंवादात गांधी फाउंडेशनचे‎ समन्वयक संकेत मुनोत, अॅड.गणेश‎ कारंडे, डॉ जयप्रकाश आघाव हे‎ सहभागी झाले होते. गांधी समजून‎ घेण्यासाठी गांधीच्या आधीचा भारत व‎ गांधी आल्यानंतरचा भारत यांच्या‎ अभ्यास करावा लागेल. गांधींच्या‎ आधीचा भारत हा सर्वसामान्यांसाठी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नव्हता तर मूठभर संस्थांनिकासाठी होता.‎ गांधी आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य हे‎ उच्चवर्णीयांसाठी नसून‎ सर्वसामान्यांसाठी असेल हे जाहीर‎ केल्यानंतर सर्वसामान्य जनता स्वातंत्र्य‎ लढ्यात सामील झाली. त्यामुळे हा लढा‎ यशस्वी झाला. राष्ट्र घडविण्यात गांधीचा‎ वाटा मोठा होता. भारत देशाच्या‎ स्वातंत्र्याचा लढा खऱ्या अर्थाने‎ सर्वसामान्यांच्या हिताचा होता.

महात्मा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गांधी यांनी हीच भूमिका देशातील‎ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली.‎ गांधीचे तत्वज्ञान जगाला दिशा देणारे‎ आहे, असेही गांधी फाउंडेशनचे‎ समन्वयक संकेत मुनोत यांनी सांगितले.‎ गांधी सर्वांसोबत असून गांधी शिवाय‎ माणूस जगू शकणार नाही. खेड्याकडे‎ चला ही संकल्पना गांधीजींनी आणली‎ आणि आजचे सरकार स्मार्ट सिटीच्या‎ मागे आहे. त्यामुळे आपण विचार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करण्याची गरज आहे. ग्रामीण भाग आज‎ ओस पडताना दिसत आहे. ज्येष्ठांकडे‎ बघायला कोणाला वेळ नाही. गावपणं‎ हरवतं चालले आहे. त्यामुळे विकास‎ कितीही झाला तरी शाश्वतता महत्वाची‎ आहे, असेही अॅड. गणेश करांडे यांनी‎ सांगितले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन‎ बालाजी शेरेकर यांनी केले तर आभार‎ प्रदर्शन चंद्रकांत वडमारे यांनी मानले.‎ यावेळी नागरिकांची हजेरी होती.‎

बातम्या आणखी आहेत...