आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:रेशीम उत्पादनात गेवराई‎ तालुका राज्यात अव्वल‎

गेवराई‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रेशीम उत्पादनात गेवराई तालुका हा‎ ३१८ कामे पूर्ण करून राज्यात भारी‎ ठरला असून असून या कार्याबद्दल‎ तहसीलदार सचिन खाडे व त्यांच्या‎ सहकाऱ्यांचा राज्यपाल, मुख्यमंत्री‎ यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते‎ विशेष गौरव करण्यात आला.‎ मुंबई येथील यशवंतराव चव्हाण‎ केंद्र येथे आयोजित करण्यात‎ आलेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल‎ रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,‎ रोहयो मंत्री संदीपान भुमरे (‎ यांच्यासह विविध खात्याचे मंत्री,‎ मुख्यसचिव व अपर मुख्य सचिव‎ यांची उपस्थिती होती.

मनरेगा आणि‎ विविध विभागांच्या योजनांचे‎ अभिसरण करुन सुविधा संपन्न‎ कुटुंब मिशन राबवणे आणि सर्वांगीण‎ ग्रामसमृध्दी योजनेच्या अंतर्गत‎ महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी‎ योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यात‎ सातत्याने अग्रेसर भुमिका राखली‎ असून यामध्ये मोठया प्रमाणात‎ अकुशल कामे व कुशल कामांमध्ये‎ मत्ता निर्माण केलेली आहे.‎ कामांमध्ये प्रामुख्याने सार्वजनिक‎ कामांमध्ये अंगणवाडी बांधकाम,‎ गायगोठा, शेळी मेंढी पालन शेड,‎ कुक्कुटपालन शेड, शेततळे, गोदाम‎ बांधकाम, सिंचन विहिरी, नाडेप,‎ वर्मी कंपोस्ट बांधकामे, वनीकरण,‎ (शेत बांधावरील), सामाजिक‎ वनीकरण ( वनविभाग), शाळेला‎ भिंत बांधकाम करणे, रेशम उत्पादन,‎ शोषखड्डेची कामे आदी कामे. सन‎ २०२० - २१ पासून मोठया प्रमाणात‎ घेण्यात आले आहेत.

वरील सर्व‎ कामे सार्वजनिक व वैयक्तीक‎ स्वरूपाची असुन सुविधा संपन्न‎ कुटूंब मिशन व सर्वांगीण ग्रामसमृध्दी‎ योजनेची अंमलबजावणीची‎ जबाबदारी जिल्हास्तरापासून ते‎ गावपातळीपर्यंत अधिकारी,‎ कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी व‎ रोजगार सेवकांपर्यंत आहे. ही कामे‎ यशस्वी केल्याबद्दल राज्यातील‎ ग्रामपंचायतस्तर, तालुकास्तर व‎ जिल्हास्तरावर वैशिष्ट्यपूर्ण काम‎ केलेल्या ६१ अधिकारी/कर्मचारी‎ यांना पुरस्कार देण्यात आले आहेत.‎

यामध्ये, उत्कृष्ट कार्याबद्दल‎ तहसीलदार सचिन खाडे, रेशम‎ विकास अधिकारी विनीत पवार,‎ सहायक कार्यक्रम अधिकारी प्रशांत‎ कोकुडे यांच्यासह आदींचा हा विशेष‎ गौरव करण्यात आला. याबद्दल‎ त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत‎ आहे.‎ रेशीम उत्पादन संपूर्ण राज्यात सन‎ २०२० - २१ पासुन आतापर्यंत ७६३२‎ रेशीम उत्पादनाची कामे हाती घेण्यात‎ आलेली असून त्यापैकी ९१ कामे पूर्ण‎ करण्यात आली आहेत. बीड‎ जिल्ह्यांतर्गत गेवराई तालुक्यात‎ सर्वात जास्त ३१८ कामे पूर्ण करून‎ प्रगती पथावर असल्यामुळे गौरव‎ करण्यात आला.‎‎

बातम्या आणखी आहेत...