आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतप्रवाह:आपल्या कर्तव्याला प्राथमिकता देणे हा‎ संतांनी दिलेला विचार मोठा महत्वाचा‎

परळी‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नऊशे वर्षांपूर्वी ज्या उद्देशाने वारकरी‎ संप्रदायाची सुरुवात झाली तो उद्देश‎ आता मात्र बाजूला राहून त्याची जागा‎ दांभिकता, कर्मकांड आणि पाखंडाने‎ घेतलेली आहे; म्हणून समाजातील‎ जागरूक व्यक्तींनी पुढाकार घेऊन अशा‎ कीर्तन महोत्सवाचे आयोजन करणे हा‎ एक क्रांतिकारक उपक्रम आहे. संत‎ नामदेवापासून, बसवेश्वर, चक्रधर ते‎ संत तुकाराम पर्यंत सर्व संतांच्या वचनांचे‎ प्रमाण देऊन आपल्या कर्तव्याला‎ प्राथमिकता देणे हा विचार महत्त्वाचा‎ असल्याचे प्रतिपादन कवि इंद्रजीत‎ भालेराव यांनी केले.‎ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या‎ बीजेनिमित्त कान्नापूर (ता.धारुर) येथे‎ शुक्रवारपासून (ता.३ मार्च) कीर्तन‎ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले‎ आहे. परिसरातील चौदा गावांनी मिळून‎ या शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन‎ केले आहे.

या कीर्तन महोत्सवाची‎ सुरवात कवी भालेराव, उद्धवबापू‎ आपेगावकर यांच्या उपस्थितीत झाली.‎ पुढे बोलताना कवी भालेराव म्हणाले,‎ ९०० वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाची‎ सुरुवात झाली ती जनप्रबोधन व‎ समाजाला दिशा देण्यासाठी. मात्र‎ अलीकडच्या काळात आपण अनेक‎ लोक संप्रदायाला बदनाम करत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असल्याचे पाहतो. दांभिकता, कर्मकांड‎ आणि पाखंडी वृत्ती असलेल्यांनी‎ शिरकाव केलेला आहे. समाजातील‎ जागरूक व्यक्तींनी वेळीच पुढाकार‎ घ्यायला हवा. वारकरी संप्रदाय हा खऱ्या‎ अर्थाने समतेची शिकवण देणारा आहे.‎ त्यामुळे या संप्रदायाचा मुळ विचार‎ आपणा साऱ्यांनी विसरू नये, असेही‎ भालेराव यांनी सांगितले. सध्याच्या‎ पोटभरू परमार्थाबद्दल उद्धव बापू‎ आपेगावकर यांनी शेलक्या शब्दात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ परखड प्रहार केले.

त्याचवेळी‎ शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचा‎ शेतकरी पुत्रांनीच मोलभाव करू नये. तो‎ योग्य किंमतीत खरेदी करावा जेणेकरून‎ शेतकऱ्यांना आपल्या कामाचं योग्य मोल‎ मिळेल, असा विचार गोविंद शेळके‎ यांनी मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक‎ श्यामसुंदर महाराज सौन्नर यांनी केले.‎ १४ गावच्या संयोजन समितीने पुढाकार‎ घेऊन हा कीर्तन महोत्सव सुरू केलेला‎ आहे. त्यावेळी पंचक्रोशीतील बहुसंख्य‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नागरिक व महिला उपस्थित होत्या.

नऊ‎ मार्च पर्यंत हा कीर्तन महोत्सव चालणार‎ असून असेच उद्बोधक कार्यक्रम कीर्तन‎ सुरू राहणार आहेत. याचा परिसरातील‎ शेतकऱ्यांनी, आबालवृद्ध महीला,तरुण‎ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित‎ राहुल लाभ घ्यावा अशी आवाहन‎ समन्वय समितीचे ॲड.अजय बुरांडे‎ यांनी केले. दरम्यान, शेतकरी कीर्तन‎ महोत्सवास पहिल्या दिवशी कीर्तनास‎ मोठी हजेरी होती.‎

बातम्या आणखी आहेत...