आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अघोरी कृत्यासाठी बीडच्या सौंदाणा‎ येथे विवाहितेचा विवस्त्र करून छळ‎:पीडित महिलेची पुण्याच्या विश्रांतवाडी पोलिसांत तक्रार‎

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सासरकडील सात‎ जणांविरोधात गुन्हा नोंद‎

‎ पहिले लग्न झालेले असताना दुसरा ‎ ‎ प्रेमविवाह केला. पुन्हा नांदायला‎ न्यायला नकार दिला. पोलिसांत धाव ‎ ‎ घेतल्यानंतर नांदायला घेऊन‎ गेल्यावर सासरच्या मंडळींनी छळ ‎ ‎ केला. सासऱ्याने बाथरूमचा‎ दरवाजा उघडा ठेवून अंघोळ‎ करायला लावत विनयभंग केला.‎ शिवाय, अघोरी कृत्य करण्यासाठी‎ विवस्त्र करून मासिक पाळीच्या‎ काळात होणारा रक्तस्राव‎ काढल्याचा संतापजनक प्रकार बीड‎ तालुक्यातील सौंदाणा येथे घडल्याचे‎ समोर आले आहे. या प्रकरणातील‎ पीडितेने पुण्याच्या विश्रांतवाडी‎ पाेलिसात याप्रकरणी तक्रार दिली.‎ त्यावरून सात जणांविरोधात गुन्हा‎ नोंद करण्यात आला.‎ २७ वर्षीय पीडितेने याप्रकरणी‎ दिलेल्या तक्रारीनुसार, २०१९ मध्ये‎ तिचा प्रेमविवाह सागर बाबासाहेब‎ ढवणे (रा. सौंदाणा, ता. बीड)‎ ‎ याच्याशी झाला होता. लग्नानंतर ते‎ दोघे एक महिना कोल्हापुरात‎ वास्तव्यास होते. त्यानंतर पुण्याच्या‎ चंदननगरमध्ये ते राहण्यास आले. या‎ वेळी सागर याचा यापूर्वीही एक‎ विवाह झालेला असल्याची माहिती‎ पीडितेला मिळाली. याबाबत तिने‎ नवरा व सासूला जाब विचारला‎ असता पहिल्या पत्नीला घटस्फोट‎ देणार असल्याचे सांगून पीडितेला‎ माहेरी पाठवले गेले. नंतर‎ लॉकडाऊन लागल्याने पीडिता‎ पुण्यात अडकून पडली व तिचा‎ सासरच्यांशी संपर्क कमी झाला.‎ लॉकडाऊननंतर पतीने पहिली पत्नी‎ नांदायला आणल्याचे तिला कळले व‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ पीडितेला नांदवण्यास सासरच्यांनी‎ नकार दिला. २०२१ मध्ये पीडितेने‎ कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली.‎ त्यानंतर सासरच्या मंडळींनी पुन्हा‎ तिला नांदायला नेले. सासरी तिचा‎ छळ केला गेला. उपाशी ठेवले गेले.‎ सप्टेंबर २०२२ मध्ये दिराने‎ आपल्याला अघोरी विद्या येत‎ असल्याचे सांगून त्यासाठी तुला‎ मूलबाळ नसल्याने तु्झ्या मासिक‎ पाळी काळातील रक्त लागेल व‎ यामुळे ५० हजार रुपये मिळतील,‎ असे सांगितले. एक दिवस सर्वांनी‎ संगनमत करून पतीला बाहेरगावी‎ पाठवले व विवस्त्र करून मासिक‎ पाळीतील रक्तस्राव काढला.‎

सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पोलिसात धाव‎
पतीने समजूत काढून पुन्हा पीडितेला‎ पुण्याला वास्तव्यास नेले हाेते. मात्र‎ नोव्हेंबर २०२२ मध्ये मावस दिराने‎ येऊन पतीला नेले. शोधासाठी‎ पीडिता गावी आली असता या‎ कुटुंबाने तीन महिन्यांपूर्वीच गाव‎ सोडल्याचे कळले. त्यामुळे पीडितेने‎ सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने‎ पुण्याच्या विश्रांतवाडी ठाण्यात धाव‎ घेतली. याप्रकरणी पती, सासू,‎ सासरा, दीर, मावस दीर, भाचा व‎ गावातील एक व्यक्ती या सात‎ जणांविरोधात विनयभंग, अनैसर्गिक‎ कृत्य, जादूटोणाविरोधी‎ कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात‎ आला.‎

बातम्या आणखी आहेत...