आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत, गुरूंच्या आज्ञेवर श्रद्धा ठेवावी,आयुष्यात आपल्याला काहीही कमी पडणार नाही. संताचिया पायीची धुळ व्हावी. यातच जीवन कृत कृतार्थ होते, असे प्रतिपादन नाना महाराज यांनी केले. श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपेने व सुदामदेव महाराज व शांती ब्रम्ह रामहरी महाराज बाबा यांच्या कृपा आशिर्वादाने वै. सुदामदेव बाबा यांच्या शताब्दीनिमित्त सुरु झालेल्या सावंतवाडी येथील अखंड हरीनाम सप्ताहात नाना महाराज कदम यांचे कीर्तन झाले. ‘
संतांचिया पायी हा माझा विश्वास, सर्वभावे दास झालो त्यांचा’ या अभंगावर त्यांनी निरूपण केले. नाना महाराज कदम म्हणाले, की संत तुकाराम महाराज सांगत की मला संतांवर, त्यांच्या पायी एवढा दृढ विश्वास आहे की मी संपूर्णपणे आणि सर्व भावाने त्यांचा दास झालो आहे. तेच खऱ्या अर्थाने मला योग्य तो मार्ग दाखवून किंबहुना योग्य त्या मार्गावर आणून माझे सर्व हित करतील जेणेकरून श्री हरी माझ्यावर कृपा करेल.
आपणही संतांची ही वचने लक्षात ठेवून आपली वर्तणूक ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गोरख महाराज वायभट, रोहिदास महाराज शिंदे, मृदंगाचार्य बंडू महाराज सातपुते, शंतनु महाराज धूर्वे, रणजित महाराज शिंदे, हरिदास महाराज खुळे, सिरसाठ महाराज, श्रीकृष्ण महाराज खोसे, त्रिंबक महाराज शेळके, वसंत महाराज शिंदे,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.