आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातील भिती:विद्यार्थीदशेतील ज्ञान‎ भविष्यात मोलाचे ठरते

अंबाजोगाई‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी परीक्षेतील पेपर‎ सोडवल्यास अनुभवाने त्यांच्या‎ मनातील भिती निघून जाते. त्यासाठी‎ मनाची एकाग्रता वाढवली पाहीजे.‎ आपण घडलो तरच राष्ट्र घडू शकते.‎ विद्यार्थिदशेत प्राप्त केलेले ज्ञान‎ भविष्यात मोलाचे ठरते.ज्ञानाचा‎ उपयोग समाजासाठी झाला पाहिजे‎ असे प्रतिपादन अंबाजोगाई सार्वजनिक‎ बांधकाम विभागाचे कार्यकारी‎ अभियंता गौरीशंकर स्वामी यांनी केले.‎

अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन‎ विद्यालयाच्या वार्षिक‎ स्नेहसंमेलनानिमित्त शनिवारी ४‎ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रमुख पाहुणे‎ गौरीशंकर स्वामी हे बोलत होते.‎ अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण‎ संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शिवाजीराव‎ कराड, प्राध्यापक नागनाथ गरजाळे,‎ संस्थेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक‎ माणिकराव लोमटे, ॲड. संतोष पवार,‎ मुख्याध्यापिका अपर्णा पाठक,‎ उपमुख्याध्यापक विलास गायकवाड,‎ पर्यवेक्षक रवी मठपती विवेकानंद‎ कुलकर्णी,पर्यवेक्षक सुभाष शिंदे‎ ,शिक्षक प्रतिनिधी भागवत मसने,‎ गणेश कदम, संमेलनाचे प्रमुख‎ वैशाली भुसा, शिवकन्या सोळुंके,‎ विद्यार्थी संसदेचे उपाध्यक्ष प्रणव‎ रामदासी, सचिव सुशांत संगापुडे‎ आदी उपस्थित होते.

थोर स्वातंत्र्य‎ सेनानी स्वामी रामानंद तीर्थ व बीड‎ जिल्ह्याचे माजी खासदार बाबासाहेब‎ परांजपे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण‎ करून करण्यात आली.‎ अध्यक्षीय समारोपात‎ ॲड.शिवाजीराव कराड यांनी‎ बोलतांना सांगीतले की, स्नेहसंमेलन‎ म्हणजे आनंदाचा सोहळा असून‎ विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी राहावे. स्वामी‎ रामानंद तीर्थ यांनी ज्ञान आणि विज्ञान‎ या दोन्हीची सांगड घालून आदर्श‎ संस्था आणि विद्यार्थी निर्माण केल्याचे‎ सांगितले. मान्यवरांच्या हस्ते विविध‎ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या‎ विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण‎ करण्यात आले. प्रास्ताविक‎ मुख्याध्यापक अपर्णा पाठक तर‎ सूत्रसंचालन सहशिक्षक बालाजी‎ मसने, प्रतीक्षा गंगणे, सुचिता कडके‎ यांनी केले. आभार रवी मठपती यांनी‎ मानले.‎

बातम्या आणखी आहेत...