आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखान्याचे योग्य नियोजन:जय महेशच्या व्यवस्थापकांचा सत्कार‎

मालगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव‎ तालुक्यातील पवारवाडी‎ येथील जय महेश साखर‎‎ कारखान्याच्या योग्य नियोजनामुळे १‎ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या तीन महिन्यात‎ ७ लाख २ हजार ६३६ मेट्रिक टन‎ ऊसाचे गाळप केले असून ५ लाख २५‎ हजार ८५० क्विंटल साखर पोत्यांचे‎ उत्पादन झाले आहे. याबद्दल‎ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब‎ जाधव यांनी शिवसेनेच्या वतीने‎ कारखान्याचे व्यवस्थापक पारसनाथ‎ जायसवाल, मुख्य शेतकी अधिकारी‎ सुजय पवार, वरिष्ठ केन मॅनेजर‎ दत्तात्रय आहेरकर, केन मॅनेजर भास्कर‎ फपाळ, रामभाऊ सोळंके यांचा‎ सत्कार केला.‎

उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके,‎ तालुका प्रमुख प्रभाकर धरपडे, मुंजाबा‎ जाधव, अतुल उगले, दासुपाटील‎ बादाडे, शिवाजी चव्हाण, सुखदेव‎ धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.‎ पवारवाडी येथील खासगी तत्वावर‎ असलेल्या जय महेश‎ साखर‎ कारखान्याने उस गाळपाची क्षमता‎ वाढविली असून या गाळप हंगामामध्ये‎ उस गाळपाचे नियोजन योग्य पद्धतीने‎ केले आहे.

त्यानुसार उसतोड‎ यंत्रणेच्या माध्यमातुन उसतोडणीचे‎‎ ‎काम सुरू आहे. यावर्षी झालेल्या‎‎ ‎अल्पशा पावसामुळे लागवड व‎‎ खोडवा उसाला सरासरी तीस ते‎‎ ‎चाळीस टन प्रतिएकर पेक्षा अधिकचा‎‎ उतार शेतकऱ्यांना मिळत नाही.‎ ‎मागील‎ वर्षाच्या तुलनेत यावर्षी‎ उसाच्या‎ वजनामध्येही मोठ्या प्रमाणात घट‎ झाली आहे.‎ जय महेश कारखान्याने‎ प्रतिदिन उस‎ गाळप क्षमता आठ हजार‎ पाचशे मेट्रीक टन केलेली असून हा‎‎ कारखाना प्रत्यक्ष आठ हजार दोनशे ते‎‎ आठ हजार तिनशे मेट्ीक टन प्रतिदिन‎‎ उसाचे गाळप करत आहे. १ नोव्हेंबर‎‎ पासुन या कारखान्याच्या गाळप‎ हंगामास प्रत्यक्ष सुरूवात‎ झाली होती.‎

बातम्या आणखी आहेत...