आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव येथे एका विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर माहेरच्या मंडळींनी घातपाताचा आरोप करुन सासरच्या मंडळींवर खुनाचा गुन्हा नोंद करण्याच्या मागणीसाठी मृतदेह थेट एस पी कार्यालयात आणला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. माजलगाव शहरातील फुले नगर भागातील विवाहिता शेख बानो शेख रफिक (३५) या महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. सासरच्या मंडळींनी हृदयविकारच्या झटक्याने हा मृत्यू झाल्याचे सांगितले मात्र विवाहितेच्या कानातून, डोळ्यातून व नाकातून रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे माहेरच्या मंडळींनी घातपाताचा संशय व्यक्त केला. सासरच्या मंडळींवर खूनाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. मात्र, माजलगाव शहर पोलिसांनी गुन्हा नोंद न केल्याने मृतदेह घेऊन थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. एसपींनी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते मात्र बुधवारी दुपार पर्यंत गुन्हा नोंद नव्हता. नातेवाईकांनी विवाहितेचा मृतदेह एसपी कार्यालयात आणल्याने तणाव निर्माण झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.