आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील आझाद नगर येथील नाल्या तुंबल्यामुळे सांडपाणी साचून परिसरासह मुख्य रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. तत्काळ नाले सफाई करण्यात यावी. या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी गुरुवारी नगर परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शहरातील आझाद नगर येथून सांडपाणी वाहून नेणारा मोठा नाला गेला आहे. मात्र या नाल्याची मागील अनेक महिन्यापासून नाल्यातील घाण स्वच्छ्ता करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा नाला तुंबला गेला असून सांडपाणी या भागातील नागरिकाच्या घरात, रस्त्यावर साचले आहे.
या मुख्य रस्त्यालगतच्या विद्युत पुरवठा करणारी रोहित्र असल्याने मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे संतप्त होऊन गुरुवारी सकाळी ११.३० वाजता आझाद नगरच्या शेकडो नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात ठिय्या मांडून पालिकेच्या निष्क्रियतेचा निषेध केला. यावेळी प्रशासक अविनाश निळेकर यांनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन निवेदन स्विकारले. तात्काळ नाले सफाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ॲड.सय्यद याकूब, सलीम बापू सय्यद, राम गायकवाड, अशोक लांडगे, समशेर पठाण, शेख आसेफ, फारुख सय्यद, महेबुब सय्यद आदींसह नागरिक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.